शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुख्यमंत्री येताच पाऊस सुरू झाला, गारा पडल्या; कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 11:15 IST

काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत विभागीय स्तरावरील कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी शुक्रवारी अजमेरला पोहोचले. मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचताच जोरदार पाऊस सुरू झाला आणि गारा पडू लागल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला. कार्यकर्ते जात असल्याचं पाहून काही नेत्यांनी घाईघाईने सभास्थळाच्या गेटवर पोहोचून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते थांबले नाहीत. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील बॅनर, पोस्टरही फाडले. पण, मुसळधार पावसात अशोक गेहलोत यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनीही कौतुक केलं आहे. 

कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा पुढे म्हणाले, राजस्थान सरकारने ऐतिहासिक कामे केली आहेत. जनतेला पुन्हा एकदा राजस्थानची सत्ता काँग्रेसच्या हाती सोपवायची आहे. आता जनतेत जाऊन काँग्रेस सरकारचे यश सांगण्याची पाळी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड, काँग्रेसचे गुजरात प्रभारी रघु शर्मा आणि अन्य नेत्यांनीही संबोधित केले.

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना गेहलोत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. भाजपाच्या राजवटीत घटनात्मक संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशाची घटना आणि लोकशाही आता धोक्यात आली आहे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने अदानींचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर सरकारने उत्तर द्यायला हवे होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान