शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 17:34 IST

यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.  

राजकारणात काहींना वारंवार लॉन्च करण्याची गरज पडते. तर स्टार्टअपच्या जगात जेव्हा एखादी  व्यक्ती अपयशी ठरते, तेव्हा दुसरा मार्ग स्वीकारते, असे पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याकडे राहुल गांधींना टोमणा म्हणून बघितले जात आहे. कारण राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा नुकताच समारोप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या 'स्टार्टअप महाकुंभ'ला संबोधित करत होते. यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.  

स्टार्ट-अप लॉन्च तर अनेक लोक करतात... -स्टार्ट-अप महाकुंभमध्ये स्टार्ट-अप आणि राजकारणाची तुलना करताना कुणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले, ‘‘बरेच लोक स्टार्ट-अप लॉन्च करतात. राजकारणात तर अधिक... आणि वारंवार लॉन्च करावे लागते. मात्र, आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे की, आपण प्रयोगशील असतात, जर एक लॉन्च झाला नाही तर लगेच दुसऱ्यावर जाता."

मोदी पुढे म्हणाले, भारताने गेल्या काही दशकांत IT आणि सोफ्टवेअर सेक्टरमध्ये आपी छाप पाडली आहे. आता आपण भारतात. इनोव्हेशन आणि स्टार्टअप कल्चरचा ट्रेंड सातत्याने वाढताना दिसत आहे. यावेळी मोदींनी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा आणि एक एप्रिल, 2024 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पूर्ण बजेट सादर करण्याचा विश्वासही व्यक्त केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस