शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

पंढरपूरसाठी देशभरातून रेल्वे गाड्या सुरू करा- बनसोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 04:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून पंढरपूर वारीचे महत्त्व सांगून सव्वाशे कोटी देशवासीयांना एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची विनंती केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून पंढरपूर वारीचे महत्त्व सांगून सव्वाशे कोटी देशवासीयांना एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची विनंती केली. त्यानंतर देशभरातून फोन, ई-मेल आलेत. लोकांनी ज्या वेळी पंढरपूरला कसे पोहोचायचे? असा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र मला लाज वाटली, अशा शब्दांत सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी लोकसभेत भावनांना वाट मोकळी करून दिली. धार्मिक स्थळ असूनही पंढरपूरला पोहोचण्यासाठी केवळ शुक्रवार, शनिवार व रविवारीच रेल्वे गाडी असते. सर्व देशवासीयांना पंढरपूरला भेट द्यावी, असे पंतप्रधानांना वाटत असेल, तर पंढरपूरला जाण्यासाठी रोज रेल्वे गाडी असावी, अशी विनंती बनसोडे यांनी सरकारला केली.मानसरोवरला जाणाऱ्यांची चीनकडून अडवणूककैलाश मानसरोवर यात्रेला जाणा-या भाविकांची चीन सरकारकडून अडवणूक केली जात असल्याची गंभीर माहिती मावळचे खा. श्रीरंग अप्पा बारणे यांनी दिली. नेपाळ-तिबेटमार्गे कैलाश मानसरोवर यात्रा पूर्ण करावी लागते. राजकारणी, पत्रकारांना चीन सरकार व्हिसा देत नाही. लोकांची अडवणूक केली जाते. तिबेट-चीन सीमेवर इमिग्रेशन केंद्र आहे. तेथे भाविकांना पाच ते सहा तास वाट पाहावी लागते, अशा अनेक अडचणी लोकांना येतात. लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न चीनी अधिकारी करतात, अशी तक्रार बारणे यांनी केली.>बँक कर्ज देत नाहीमहाराष्ट्र व देशात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येस राष्ट्रीय बँकांमधून कर्ज न मिळणे हे देखील महत्त्वाचे कारण असल्याचा दावा उस्मानाबादचे खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केला. ते म्हणाले की, सरकारने कर्ज वितरणासाठी एका गावाला एक बँक जोडली.पण पन्नास हजारापर्यंतची थकबाकी असल्यास बँक सरळ एनपीएमध्ये टाकते. त्यामुळे शेतकºयांना दुसरे कर्ज मिळत नाही. व्यापाºयांना, उद्योजकांना सहज कर्ज मिळते. शेतकºयांनादेखील त्यांच्याकडे असलेल्या जमिनीच्या किंमतीच्या पटीत कर्ज मिळावे. सहकारी बँकांमध्ये असे कर्ज मिळत असे.

टॅग्स :railwayरेल्वे