शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

महाराष्ट्रात किल्ल्यांची ‘पर्यटन यात्रा’ सुरू करा, स्वदेश दर्शनसाठी राज्याला १३६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:43 IST

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा जळगावचे ए.टी. पाटील यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा जळगावचे ए.टी. पाटील यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला. चीनमधील टेराकोटा स्मारक व इस्राएलमधील हायपा युद्धस्मारकाच्या धर्तीवर भारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे मूक साक्षीदार असलेल्या गड, किल्ल्यांच्या पर्यटनाची योजना सुरू करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. त्यावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फान्स कन्ननाथनम म्हणाले, रायगड किल्ल्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेऊन पर्यटनवाढीसाठी योजना आखण्यात येईल. ‘स्वदेश दर्शन’साठी महाराष्ट्रातून नऊ प्रस्ताव आले आहेत. कालिदास महोत्सवासाठी २५ लाख, एलिफंटा महोत्सवासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वदेश दर्शन योजनेत महाराष्ट्रासाठी १३६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.>एलोरा महोत्सवासाठी निधी नाही : अजिंठा-एलोरा महोत्सवासाठी केंदाने एकदाही निधी दिला नसल्याची खंत औरंगाबादचे चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. एलोरा महोत्सवासाठी देशभरातील पर्यटक येतात. त्यासाठी निधी देण्याची विनंती खैरेंंनी केली. त्यावर, राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास आम्ही तातडीने निधी देऊ, असे देण्यात आले.>पुण्यात अस्थायी रोजगारनिर्मितीकौशल्य असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण पुढे करणाऱ्या करणाºया केंद्र सरकारची शिरूरचे शिवाजीराव आढळराव यांनी चांगलीच कोंडी केली. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यात अनेक तंत्रकुशल युवक आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व आॅटोमोबाइल क्षेत्रात पुण्यात अनेकांना रोजगार मिळाला. मात्र पीएमकेवीवाय व एनईईएम योजनेत उच्च शिक्षित इंजिनिअर्सना १२ हजार रुपये वेतन दिले जाते. चाकण व पुणे एमआयडीसीत कंपन्यांमध्ये थेट भरती होत नाही. एनईईएम योजनेतून भरती होते. उत्पादन क्षेत्रासाठी असलेल्या योजनांमधून पुरेशा रोजगाराच्या संधी दिल्या जात नाही.>शेतकरी प्रशिक्षण : नव उद्योजक, शेतकºयांना रोजगारनिर्मितीसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था आहे का? असा प्रश्न पुण्याचे अनिल शिरोळे यांनी विचारला. विविध योजना, संस्थांच्या, केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले.>बीएसएनएललातोट्यातून बाहेर काढाखासगी दूरसंचार कंपन्यांचा विस्तार होत असताना सरकारी बीएसएनल व एमटीएनएल कंपन्यांचा तोटा वाढत असल्याची माहिती दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत यांनी दिली. वेळीच उपाययोजना न केल्यास या कंपन्या संपतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. बीएसएनएलच्या अवस्थेला कारणीभूत असलेल्यांची केंद्रीय दक्षता आयोगामार्फत चौकशी करावी आणि बीएसएनएलला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.