शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महाराष्ट्रात किल्ल्यांची ‘पर्यटन यात्रा’ सुरू करा, स्वदेश दर्शनसाठी राज्याला १३६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 04:43 IST

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा जळगावचे ए.टी. पाटील यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या जीर्णोद्धाराचा मुद्दा जळगावचे ए.टी. पाटील यांनी सोमवारी लोकसभेत उपस्थित केला. चीनमधील टेराकोटा स्मारक व इस्राएलमधील हायपा युद्धस्मारकाच्या धर्तीवर भारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे मूक साक्षीदार असलेल्या गड, किल्ल्यांच्या पर्यटनाची योजना सुरू करण्याची विनंती त्यांनी सरकारला केली. त्यावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फान्स कन्ननाथनम म्हणाले, रायगड किल्ल्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेऊन पर्यटनवाढीसाठी योजना आखण्यात येईल. ‘स्वदेश दर्शन’साठी महाराष्ट्रातून नऊ प्रस्ताव आले आहेत. कालिदास महोत्सवासाठी २५ लाख, एलिफंटा महोत्सवासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वदेश दर्शन योजनेत महाराष्ट्रासाठी १३६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.>एलोरा महोत्सवासाठी निधी नाही : अजिंठा-एलोरा महोत्सवासाठी केंदाने एकदाही निधी दिला नसल्याची खंत औरंगाबादचे चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. एलोरा महोत्सवासाठी देशभरातील पर्यटक येतात. त्यासाठी निधी देण्याची विनंती खैरेंंनी केली. त्यावर, राज्य सरकारने प्रस्ताव दिल्यास आम्ही तातडीने निधी देऊ, असे देण्यात आले.>पुण्यात अस्थायी रोजगारनिर्मितीकौशल्य असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण पुढे करणाऱ्या करणाºया केंद्र सरकारची शिरूरचे शिवाजीराव आढळराव यांनी चांगलीच कोंडी केली. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यात अनेक तंत्रकुशल युवक आहेत. इलेक्ट्रॉनिक्स व आॅटोमोबाइल क्षेत्रात पुण्यात अनेकांना रोजगार मिळाला. मात्र पीएमकेवीवाय व एनईईएम योजनेत उच्च शिक्षित इंजिनिअर्सना १२ हजार रुपये वेतन दिले जाते. चाकण व पुणे एमआयडीसीत कंपन्यांमध्ये थेट भरती होत नाही. एनईईएम योजनेतून भरती होते. उत्पादन क्षेत्रासाठी असलेल्या योजनांमधून पुरेशा रोजगाराच्या संधी दिल्या जात नाही.>शेतकरी प्रशिक्षण : नव उद्योजक, शेतकºयांना रोजगारनिर्मितीसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था आहे का? असा प्रश्न पुण्याचे अनिल शिरोळे यांनी विचारला. विविध योजना, संस्थांच्या, केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले.>बीएसएनएललातोट्यातून बाहेर काढाखासगी दूरसंचार कंपन्यांचा विस्तार होत असताना सरकारी बीएसएनल व एमटीएनएल कंपन्यांचा तोटा वाढत असल्याची माहिती दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत यांनी दिली. वेळीच उपाययोजना न केल्यास या कंपन्या संपतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. बीएसएनएलच्या अवस्थेला कारणीभूत असलेल्यांची केंद्रीय दक्षता आयोगामार्फत चौकशी करावी आणि बीएसएनएलला आर्थिक मदत करावी, अशी मागणी सावंत यांनी केली.