शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

श्रीलंकेच्या नौदलाने केली 4 तमीळ मच्छिमारांना अटक, नोव्हेंबरमधील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:02 IST

आपल्या सीमाक्षेत्रामध्ये येऊन मासेमारी केली असा ठपका ठेवत श्रीलंकेच्या नौदलाने चार तामिळी मच्छिमारांना अटक केली आहे. तामिळी मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेण्याची ही एका महिन्याच्या कालावधीतील तिसरी घटना आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या मच्छिमारांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. तसेच हे मच्छिमार आपल्या पारंपारिक मत्स्यक्षेत्रातच मासेमारी करतात असेही त्यांनी या पत्रात लिहिले होते.

रामेश्वरम- आपल्या सीमाक्षेत्रामध्ये येऊन मासेमारी केली असा ठपका ठेवत श्रीलंकेच्या नौदलाने चार तामिळी मच्छिमारांना अटक केली आहे. तामिळी मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेण्याची ही या महिन्यातील तिसरी घटना आहे. तामिळनाडूच्या पदुकोट्टाई जिल्ह्यातील जगदिपट्टणम येथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळील नेदुंथीवू येथे मासेमारी केल्याने त्यांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडल्याचे पदुकोट्टाईच्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या महिन्यात एकूण 25 मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले आहे. 5 नोव्हेंबर रोजी नागपट्टणमच्या 8 मच्छिमारांना तर 2 नोव्हेंबर रोजी पदुकोट्टाईच्या 13 मच्छिमारांना अटक झालेली आहे. या सर्वांवर श्रीलंकेच्या अधिकारक्षेत्रात येऊन मासेमारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.नागपट्टणमच्या मच्छिमारांच्या तीन यांत्रिक बोटीही पकडण्यात आल्या आहेत. श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या 54मच्छिमारांना सोडवून आणावे तसेच 140 यांत्रिक बोटी सोडवून आणाव्यात अशी मागणी तामिळनाडू सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार केली जात आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या मच्छिमारांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली होती. तसेच हे मच्छिमार आपल्या पारंपारिक मत्स्यक्षेत्रातच मासेमारी करतात असेही त्यांनी या पत्रात लिहिले होते.

पंतप्रधानांच्या भेटीने मच्छिमारांचा प्रश्न सुटणार का ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी, द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधींचे चिरंजीव एम. के. स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवासस्थानी स्वागत केले. त्यांच्या या भेटीमुळे अण्णा द्रमुकचे नेते अस्वस्थ झाले आहेत, तर तामिळनाडूमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर भाजपामध्येही काहीशी खळबळ माजली आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे तामिळनाडूच्या विविध प्रश्नांबरोबर मच्छिमारांना भारतात पुन्हा अणले जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मच्छिमारांबरोबर तामिळनाडूच्या दुष्काळाचाही मोठा प्रश्न आहे.कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि करुणानिधी यांच्या भेटीवेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तामिलीसाई सुंदरराजन यांची उपस्थिती होती. व्हीलचेअरवर असलेल्या करुणानिधी यांच्याजवळ बसून मोदी यांनी त्यांची चौकशी केली. करुणानिधींची मुलगी कणिमोळी यांच्यासह द्रमुकचे अन्य नेतेही या वेळी हजर होते. अण्णा द्रमुकशी मैत्री असताना, मोदी यांनी द्रमुक नेत्यास भेटण्याचे कारण काय, अशी चर्चा इथे सुरू आहे.