शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Sri Lanka is in Map of India: ...म्हणून भारताच्या नकाशात नेहमी असतो श्रीलंकेच्या भूमीचा समावेश, असं आहे आश्चर्यजनक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 15:15 IST

Sri Lanka is in Map of India: भारताचे मानचित्र किंवा भारताच्या अधिकृत नकाशामध्ये तुम्ही दक्षिणेला श्रीलंकेची भूमीही दाखवलेली तुम्हाला दिसेल. मात्र भारताच्या या नकाशात पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांची भूमी ठळकपणे दर्शवली जात नाही.

नवी दिल्ली - भारताचे मानचित्र किंवा भारताच्या अधिकृत नकाशामध्ये तुम्ही दक्षिणेला श्रीलंकेची भूमीही दाखवलेली तुम्हाला दिसेल. मात्र भारताच्या या नकाशात पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांची भूमी ठळकपणे दर्शवली जात नाही. पाकिस्तान, बांगलादेश हे कधीकाळी अखंड भारताचा भाग होते. मात्र श्रीलंका हा कधीही भारताचा भाग राहिलेला नाही. मात्र असं असतानाही श्रीलंकेचा नकाशा भारताच्या नकाशात का समाविष्ट केला जातो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

भारताचा श्रीलंकेवर काही अधिकार आहे का, अशा विचार तर तुम्ही करत नाही ना, असं काहीही नाही आहे. भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा समावेश असतो, याचा अर्थ भारताचा श्रीलंकेवर काही अधिकार आहे किंवा नकाशाबाबत दोन्ही देशांमध्ये काही करार झालेला आहे, असं नाही आहे. तर यामागचं कारण खूप गमतीदार आहे.

असं करण्यामागे एक सागरी कायदा आहे. त्याला ऑसियन लॉ म्हणतात. हा कायदा संयु्क्त राष्ट्रांनी तयार केलेला आहे. १९५६ मध्ये हा कायदा तयार करण्यासाठी युनायटेड नेशन्स कन्वेशन ऑन द लॉ ऑफ द सी नावाच्या एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. १९५८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याचा निकाल जाहीर केला होता. या संमेलनामध्ये समुद्राशी संबंधित सीमांबाबत एकमत करण्यात आले. सन १९८२ पर्यंत याची तीन संमेलने आयोजित केली गेली होती. त्यामधून समुद्राशी संबंधित कायद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली.

या कायद्यात निश्चित करण्यात आल्यानुसार भारताच्या नकाशामध्ये कुठल्याही देशाच्या बेसलाईनपासून २०० नॉटिकल मैलदरम्यान येणारी जमीन दाखवणे अनिवार्य आहे. म्हणजेच कुठलाही देश समुद्राच्या किनाऱ्यावर असेल तर अशा स्थितीत त्या देशाच्या नकाशामध्ये त्याच्या सीमेपासून २०० नॉटिकल मैलदरम्यान येणारे क्षेत्र दाखवणे आवश्यक आहे.

२०० नॉटिकल मैल म्हणजे किमी एवढं अंतर होतं. त्यामुळे भारताच्या सीमेपासून ३७० किमी अंतरापर्यंतचं क्षेत्र मानचित्रामध्ये दाखवणं आवश्यक ठरतं. त्यामुळेच श्रीलंकेचा नकाशा हा भारताच्या मानचित्रामध्ये समाविष्ट केला जातो. भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या धनुषकोडी येथून श्रीलंकेचं अंतर केवळ १८ नॉटिकल मैल एवढं  आहे. त्यामुळे भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचही स्थान महत्त्वाचं ठरतं. तर पाकिस्तान, किंवा बांगलादेश हे भारताच्या समुद्री क्षेत्रात येत नाहीत.  

टॅग्स :IndiaभारतSri Lankaश्रीलंका