शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Sri Lanka is in Map of India: ...म्हणून भारताच्या नकाशात नेहमी असतो श्रीलंकेच्या भूमीचा समावेश, असं आहे आश्चर्यजनक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 15:15 IST

Sri Lanka is in Map of India: भारताचे मानचित्र किंवा भारताच्या अधिकृत नकाशामध्ये तुम्ही दक्षिणेला श्रीलंकेची भूमीही दाखवलेली तुम्हाला दिसेल. मात्र भारताच्या या नकाशात पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांची भूमी ठळकपणे दर्शवली जात नाही.

नवी दिल्ली - भारताचे मानचित्र किंवा भारताच्या अधिकृत नकाशामध्ये तुम्ही दक्षिणेला श्रीलंकेची भूमीही दाखवलेली तुम्हाला दिसेल. मात्र भारताच्या या नकाशात पाकिस्तान, चीन, बांगलादेश आणि म्यानमार या शेजारील देशांची भूमी ठळकपणे दर्शवली जात नाही. पाकिस्तान, बांगलादेश हे कधीकाळी अखंड भारताचा भाग होते. मात्र श्रीलंका हा कधीही भारताचा भाग राहिलेला नाही. मात्र असं असतानाही श्रीलंकेचा नकाशा भारताच्या नकाशात का समाविष्ट केला जातो, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

भारताचा श्रीलंकेवर काही अधिकार आहे का, अशा विचार तर तुम्ही करत नाही ना, असं काहीही नाही आहे. भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा समावेश असतो, याचा अर्थ भारताचा श्रीलंकेवर काही अधिकार आहे किंवा नकाशाबाबत दोन्ही देशांमध्ये काही करार झालेला आहे, असं नाही आहे. तर यामागचं कारण खूप गमतीदार आहे.

असं करण्यामागे एक सागरी कायदा आहे. त्याला ऑसियन लॉ म्हणतात. हा कायदा संयु्क्त राष्ट्रांनी तयार केलेला आहे. १९५६ मध्ये हा कायदा तयार करण्यासाठी युनायटेड नेशन्स कन्वेशन ऑन द लॉ ऑफ द सी नावाच्या एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. १९५८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी याचा निकाल जाहीर केला होता. या संमेलनामध्ये समुद्राशी संबंधित सीमांबाबत एकमत करण्यात आले. सन १९८२ पर्यंत याची तीन संमेलने आयोजित केली गेली होती. त्यामधून समुद्राशी संबंधित कायद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आली.

या कायद्यात निश्चित करण्यात आल्यानुसार भारताच्या नकाशामध्ये कुठल्याही देशाच्या बेसलाईनपासून २०० नॉटिकल मैलदरम्यान येणारी जमीन दाखवणे अनिवार्य आहे. म्हणजेच कुठलाही देश समुद्राच्या किनाऱ्यावर असेल तर अशा स्थितीत त्या देशाच्या नकाशामध्ये त्याच्या सीमेपासून २०० नॉटिकल मैलदरम्यान येणारे क्षेत्र दाखवणे आवश्यक आहे.

२०० नॉटिकल मैल म्हणजे किमी एवढं अंतर होतं. त्यामुळे भारताच्या सीमेपासून ३७० किमी अंतरापर्यंतचं क्षेत्र मानचित्रामध्ये दाखवणं आवश्यक ठरतं. त्यामुळेच श्रीलंकेचा नकाशा हा भारताच्या मानचित्रामध्ये समाविष्ट केला जातो. भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेल्या धनुषकोडी येथून श्रीलंकेचं अंतर केवळ १८ नॉटिकल मैल एवढं  आहे. त्यामुळे भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचही स्थान महत्त्वाचं ठरतं. तर पाकिस्तान, किंवा बांगलादेश हे भारताच्या समुद्री क्षेत्रात येत नाहीत.  

टॅग्स :IndiaभारतSri Lankaश्रीलंका