शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Sri Lanka Crisis: भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवणार? एस जयशंकर यांचे मोठे विधान; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 21:07 IST

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले.

नवी दिल्ली: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले. सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, श्रीलंकेला अत्यंत गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे आणि स्वाभाविकपणे भारताला त्यांची खूप काळजी आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होण्याच्या दाव्यांना त्यांनी यावेळी स्पष्टपणे फेटाळून लावले.

भारताची श्रीलंकेशी तुलना चुकीची आहेश्रीलंकेच्या संकटावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी उद्घाटनपर भाष्य केले. ते म्हणाले की, हे एक अतिशय गंभीर संकट आहे. ही परिस्थिती आपल्या शेजारील देशात उद्भवल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता आहे. श्रीलंकेबद्दल अनेक खोट्या तुलना केल्या जात आहेत. काही लोक अशी परिस्थिती भारतात होऊ शकते का? असा प्रश्न विचारत आहेत. पण, श्रीलंकेशी भारताची तुलना करणे चुकीचे आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, असे ते म्हणाले.

सर्वपक्षीय बैठकीला अनेक नेते उपस्थित होतेसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. काँग्रेसचे पी चिदंबरम, मणिकम टागोर, राष्ट्रवादीचे शरद पवार, द्रमुकचे टीआर बालू आणि एमएम अब्दुल्ला, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई, तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, तेलंगणाचे केशव राव, वायएसआर काँग्रेसचे विजयसाई रेड्डी आणि एमडीएमकेचे वायको आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत