शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

Sri Lanka Crisis: भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवणार? एस जयशंकर यांचे मोठे विधान; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 21:07 IST

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले.

नवी दिल्ली: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले. सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, श्रीलंकेला अत्यंत गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे आणि स्वाभाविकपणे भारताला त्यांची खूप काळजी आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होण्याच्या दाव्यांना त्यांनी यावेळी स्पष्टपणे फेटाळून लावले.

भारताची श्रीलंकेशी तुलना चुकीची आहेश्रीलंकेच्या संकटावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी उद्घाटनपर भाष्य केले. ते म्हणाले की, हे एक अतिशय गंभीर संकट आहे. ही परिस्थिती आपल्या शेजारील देशात उद्भवल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता आहे. श्रीलंकेबद्दल अनेक खोट्या तुलना केल्या जात आहेत. काही लोक अशी परिस्थिती भारतात होऊ शकते का? असा प्रश्न विचारत आहेत. पण, श्रीलंकेशी भारताची तुलना करणे चुकीचे आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, असे ते म्हणाले.

सर्वपक्षीय बैठकीला अनेक नेते उपस्थित होतेसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. काँग्रेसचे पी चिदंबरम, मणिकम टागोर, राष्ट्रवादीचे शरद पवार, द्रमुकचे टीआर बालू आणि एमएम अब्दुल्ला, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई, तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, तेलंगणाचे केशव राव, वायएसआर काँग्रेसचे विजयसाई रेड्डी आणि एमडीएमकेचे वायको आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत