शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

स्पीड पोस्टने पाठवून दिला तलाक, पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:40 IST

सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक कळवला.

जेसलमेर : सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक कळवला.मोहम्मद अर्शद याने स्पीड पोस्टने पाठवलेले तिहेरी तलाकचे पत्र त्याची कुलसुम हिला बकरी ईदच्या दिवशीच हातात पडले. ते पत्र पूर्णपणे उर्दूतून लिहिले होते आणि अशिक्षित कुलसुमला ते अब्दुल अझिझ नावाच्या गावकºयाकडून ते वाचून घ्यावे लागले.माहम्मद अर्शद आणि कुलसुम यांचा विवाह अडीच वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीला सारे नीट चालले होते. पण नंतर मोहम्मदने पत्नीला उद्देशून ‘तू दिसायला सुंदर नाहीस, मला तू त्यामुळे आवडत नाहीस,’ असे सांगायला सुरुवात केली.पुढे त्याने पत्नीला मारहाण सुरू केली त्यामुळे कुलसुमचे वडील छोटू खान यांनी अनेकदा मध्यस्थी केली. पण त्यातून काही साध्य झाले नाही. अखेर १४ आॅगस्ट रोजी मोहम्मद अर्शदने तिला पाठवून तिला तलाक दिला. (वृत्तसंस्था)कायदेशीर कारवाई सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदा ठरविला असल्याने कुलसुमने मोहम्मद अर्शदविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात नवरा त्रास देत असे आणि पैशाची मागणी करीत असे, याचा उल्लेख तिने केला आहे. तिहेरी तलाकचा सुरुवातीला तक्रारीत उल्लेख नव्हता. पण तोही करण्यात येणार आहे.

टॅग्स :Indiaभारत