शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अॅपलच्या मदतीने वाढवणार भारतीय रेल्वेचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 21:52 IST

भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी अॅपलसारख्या कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली. 
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि  सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विविध घोषणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेचा वेग वाढवून 600 किमी प्रति तास करण्यावर सरकारची नजर आहे. त्यासाठी अॅपलसारख्या जागतिक कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे, असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. तसेच देशातील सर्वात जास्त रेल्वे वर्दळ असलेल्या दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गांवर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी नीती आयोगाने 18 हजार कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास  मंजुरी देण्यात आल्याचेही प्रभू यांनी सांगितले. हे काम झाल्यानंतर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढून 200 किमी प्रतितास होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 
अधिक वाचा(सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू )( पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट होणार - सुरेश प्रभू )( रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील : सुरेश प्रभू )

 

"सहा ते आठ महिन्यांपूर्वी सरकारने रेल्वेचा वेग 600 किमीपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी काही मोठ्या कंपन्यांना बोलावण्यात आले होते. आम्ही अॅपलसारख्या कंपन्यांशी आधीपासूनच चर्चा करत आहोत. मात्र या विकासासाठी तंत्रज्ञानाची आयात केली जाणार नाही. तर ते देशातच विकसित केले जाईल,त्याबरोबरच भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी असे डबे विकसित करण्यात येत आहेत जे रेल्वेतील बिघाडाविषयी माहिती देतील," असे प्रभू म्हणाले.