शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अॅपलच्या मदतीने वाढवणार भारतीय रेल्वेचा वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 21:52 IST

भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 -  भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी अॅपलसारख्या कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली. 
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि  सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विविध घोषणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेचा वेग वाढवून 600 किमी प्रति तास करण्यावर सरकारची नजर आहे. त्यासाठी अॅपलसारख्या जागतिक कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे, असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. तसेच देशातील सर्वात जास्त रेल्वे वर्दळ असलेल्या दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गांवर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी नीती आयोगाने 18 हजार कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास  मंजुरी देण्यात आल्याचेही प्रभू यांनी सांगितले. हे काम झाल्यानंतर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढून 200 किमी प्रतितास होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 
अधिक वाचा(सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू )( पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट होणार - सुरेश प्रभू )( रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील : सुरेश प्रभू )

 

"सहा ते आठ महिन्यांपूर्वी सरकारने रेल्वेचा वेग 600 किमीपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी काही मोठ्या कंपन्यांना बोलावण्यात आले होते. आम्ही अॅपलसारख्या कंपन्यांशी आधीपासूनच चर्चा करत आहोत. मात्र या विकासासाठी तंत्रज्ञानाची आयात केली जाणार नाही. तर ते देशातच विकसित केले जाईल,त्याबरोबरच भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी असे डबे विकसित करण्यात येत आहेत जे रेल्वेतील बिघाडाविषयी माहिती देतील," असे प्रभू म्हणाले.