शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कृषी कायद्याविरोधात केरळ विधानसभेचे विशेष सत्र; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 11:50 IST

केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात केरळ विधानसभेत प्रस्तावर सादर. विशेष सत्रात मुख्यमंत्र्याच्या प्रस्तावाला काँग्रेससह अन्य पक्षांचा पाठिंबा. भाजपचा एकमेव आमदार उपस्थित.

ठळक मुद्देकेंद्रीय कृषी कायद्याविरोधात केरळ विधानसभेत प्रस्ताव सादरशेतकऱ्यांच्या आंदोलनाला केरळ राज्याचा पाठिंबाभाजपचे एकमेव आमदार ओ राजगोपाल विशेष सत्रात उपस्थित

तिरुवनंथपूरम : केंद्रीय कृषी कायद्याला देशभरातील अनेक राज्यांतून विरोध होत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात केरळ विधानसभेत प्रस्ताव आणाला गेला असून, यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्यात आले आहे. विधानसभेचे विशेष सत्र सुरू होताच केरळचेमुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रस्ताव सादर केला आहे. 

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला काँग्रेससह विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचा केवळ एक आमदार आहे. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात प्रस्ताव सादर करताना मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले की, वर्तमानकालीन एकूण परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. देशभरातून या कायद्याला विरोध होताना पाहायला मिळत आहे. याचा केरळ राज्यावरही प्रभाव दिसू शकेल. राज्यात खाद्यपदार्थांची कमतरता भासू लागल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकेल, असे ते म्हणाले.

देश एका कठीण परिस्थितीतून जात आहे. अशातच आंदोलक शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. खराब हवामानातही शेतकरी आंदोलन करताहेत. केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेले कृषी कायदे केवळ कॉर्पोरेट घराण्यांना मदत करण्यासाठी असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. दरम्यान, काँग्रेससह अन्य पक्षांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. भाजपचे एकमेव आमदार ओ राजगोपाल यांनी विधानसभेच्या विशेष सत्रासाठी उपस्थित असल्याचे समजते.

टॅग्स :KeralaकेरळFarmerशेतकरीChief Ministerमुख्यमंत्रीKerala Congress (B)केरळ काँग्रेस (बी)