शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दिल्लीत महाराष्ट्र सदनात दिव्यांगांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 01:46 IST

सरकार दखल घेत नसल्याचा बच्चू कडूंचा आरोप

नवी दिल्ली : दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले असून, एक हजार अपंगांसह त्यांनी येथील महाराष्ट्र सदनात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत सदन सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले.केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारकडे अपंगांसाठी १६ टक्के निधी शिल्लक असतानाही दिव्यांगांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. इतर राज्यांमध्ये अपंगांना तीन हजार रुपये पेन्शन असताना महाराष्ट्रात केवळ ६०० रुपये दिले जाते. दिव्यांगासाठीच्या जागा रिक्त असतानाही भरती केली जात नाही. रोजगार देण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले असल्याचे ते म्हणाले.राष्ट्रीय स्तरावर आंदोलनप्रहार संघटनेद्वारे आम्ही दिव्यांगांचे दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. पेन्शन व रोजगार या प्रमुख मागण्या आहेत. शिक्षकांप्रमाणे दिव्यांगासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावा, असे सांगून संघटनेचे मयूर काकडे म्हणाले की, केंद्राकडून अपंगांसाठी आणलेली ‘सुगम्य भारत’ योजनाही अपयशी ठरली आहे.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू