शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वारांगनांच्या पुनर्वसनासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

वारांगनांच्या पुनर्वसनासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी

वारांगनांच्या पुनर्वसनासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी
जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा : सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीची बैठक
नागपूर :
अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत सुटका झालेल्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ५० लाख रुपये राखून ठेवण्यात येतील. यासंदर्भात पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. वारांगनांच्या पुनर्वसनासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी तथा सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी सोमवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा मार्गदर्शन करीत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, कौटुंबिक न्यायालयाच्या निवृत्त प्रधान न्यायाधीश मीरा खडक्कार, डॉ. सीमा साखरे, स्नेहलता निंबाळकर, माधुरी साकुळकर, ॲड. पद्मा चांदेकर, ॲड. प्रभा सोनटक्के, नीता भोंडे, रुबीना पटेल, माध्यमिक शिक्षणाधिकारी ओमप्रकाश गुढे, अधिवक्ता अमित खोब्रागडे, डॉ. नंदाश्री भुरे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या हेमलता लोहवे, वर्षा सोमनाथे तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ज्या महिला अनैतिक व्यवसायात असून ज्यांचे वय ६० वर्षांच्यावर आहे, अशा महिलांसाठी गडचिरोली जिल्ह्यात जसा अगरबत्ती प्रकल्प उभारण्यात आला आहे तसाच प्रकल्प नागपुरातही सुरू करण्यात येईल. त्या प्रकल्पात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केले. यासोबतच नागपूर शहर व जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात वेगळा सेल स्थापन करावा, अशी मागणी तृतीयपंथीयांतर्फे होत आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे सर्वच प्रश्न समजावून घेण्यासाठी पुढील आठवड्यात त्यांची बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स..
गंगाजमुनासाठी अभ्यास गट
गंगाजमुना येथील वस्तीत वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना स्वयंरोजगारराच्या संधी तसेच त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्यासंदर्भात विचार करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात यावा. या गटाने येत्या १५ मार्चपर्यंत पुनर्वसनाबाबत उपयोजना सूचविणारा अहवाल समितीस सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.