शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 07:52 IST

मध्य प्रदेशातील विशेष न्यायालयाने भाजपच्या लोकसभा सदस्या कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे.

Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रणौत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एका वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातील कोर्टाने कंगनाला थेट नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. २०२१ साली कंगना यांनी केलेल्या एका विधानावरुन हा वाद सुरु झाला आहे. कंगनाने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचे वर्णन भीक असे केले होते. या वक्तव्याने दुखावलेल्या वकिल अमित साहू यांनी तक्रार दाखल केली होती. आता या वक्तव्यावर कोर्टाने कंगना यांच्याकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ नोव्हेंबरला होणार आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विश्वेश्वरी मिश्रा यांनी सोमवारी या प्रकरणावर सुनावणी केली. कंगना यांचे म्हणणे योग्य नसल्याचे कोर्टात सांगण्यात आले. यासोबतच कोर्टाने कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे. कोर्टाने या वक्तव्याप्रकरणी कंगना यांच्याकडून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी ५ नोव्हेंबरला होणार आहे. पुढील सुनावणीवेळी कोर्ट कंगना यांच्या वक्तव्यावर कारवाई कशी करायची हे ठरवू शकते. मात्र, कंगना रणौत यांनी या विधानाबद्दल माफी मागितली आहे.

वकील अमित साहू यांनी २०२१ मध्ये कंगना यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. कंगना यांचे हे विधान लज्जास्पद असल्याचे साहू यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. कंगनाचे वक्तव्य म्हणजे देशातील शहीद जवानांचा अपमान आहे. हे चुकीचे आहे, असे वकील साहू यांनी म्हटलं होतं. यासोबतच वकील अमित साहू यांनी कंगनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती कोर्टाला केली आहे.

‘भारताला १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ती केवळ भीक होती. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हाच मिळालं,’ असं विधान खासदार कंगना रणौत यांनी केले होते. कंगना यांच्या वक्तव्यानंतर विरोधक आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कंगना यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी देखील त्यावेळी होऊ लागली. मात्र त्यावरही कंगना यांनी १९४७ ला कुठे कोणतं युद्ध झालं होतं, असा सवाल केला होता. त्यानंतर वाढलेला वाद पाहून कंगनाने माफी मागितली.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाCourtन्यायालय