शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 07:52 IST

मध्य प्रदेशातील विशेष न्यायालयाने भाजपच्या लोकसभा सदस्या कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे.

Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रणौत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एका वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातील कोर्टाने कंगनाला थेट नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. २०२१ साली कंगना यांनी केलेल्या एका विधानावरुन हा वाद सुरु झाला आहे. कंगनाने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचे वर्णन भीक असे केले होते. या वक्तव्याने दुखावलेल्या वकिल अमित साहू यांनी तक्रार दाखल केली होती. आता या वक्तव्यावर कोर्टाने कंगना यांच्याकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ नोव्हेंबरला होणार आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विश्वेश्वरी मिश्रा यांनी सोमवारी या प्रकरणावर सुनावणी केली. कंगना यांचे म्हणणे योग्य नसल्याचे कोर्टात सांगण्यात आले. यासोबतच कोर्टाने कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे. कोर्टाने या वक्तव्याप्रकरणी कंगना यांच्याकडून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी ५ नोव्हेंबरला होणार आहे. पुढील सुनावणीवेळी कोर्ट कंगना यांच्या वक्तव्यावर कारवाई कशी करायची हे ठरवू शकते. मात्र, कंगना रणौत यांनी या विधानाबद्दल माफी मागितली आहे.

वकील अमित साहू यांनी २०२१ मध्ये कंगना यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. कंगना यांचे हे विधान लज्जास्पद असल्याचे साहू यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. कंगनाचे वक्तव्य म्हणजे देशातील शहीद जवानांचा अपमान आहे. हे चुकीचे आहे, असे वकील साहू यांनी म्हटलं होतं. यासोबतच वकील अमित साहू यांनी कंगनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती कोर्टाला केली आहे.

‘भारताला १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ती केवळ भीक होती. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हाच मिळालं,’ असं विधान खासदार कंगना रणौत यांनी केले होते. कंगना यांच्या वक्तव्यानंतर विरोधक आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कंगना यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी देखील त्यावेळी होऊ लागली. मात्र त्यावरही कंगना यांनी १९४७ ला कुठे कोणतं युद्ध झालं होतं, असा सवाल केला होता. त्यानंतर वाढलेला वाद पाहून कंगनाने माफी मागितली.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाCourtन्यायालय