शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 07:52 IST

मध्य प्रदेशातील विशेष न्यायालयाने भाजपच्या लोकसभा सदस्या कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे.

Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार कंगना रणौत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एका वक्तव्याप्रकरणी मध्य प्रदेशातील कोर्टाने कंगनाला थेट नोटीस पाठवत उत्तर देण्यास सांगितले आहे. २०२१ साली कंगना यांनी केलेल्या एका विधानावरुन हा वाद सुरु झाला आहे. कंगनाने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याचे वर्णन भीक असे केले होते. या वक्तव्याने दुखावलेल्या वकिल अमित साहू यांनी तक्रार दाखल केली होती. आता या वक्तव्यावर कोर्टाने कंगना यांच्याकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ नोव्हेंबरला होणार आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विश्वेश्वरी मिश्रा यांनी सोमवारी या प्रकरणावर सुनावणी केली. कंगना यांचे म्हणणे योग्य नसल्याचे कोर्टात सांगण्यात आले. यासोबतच कोर्टाने कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे. कोर्टाने या वक्तव्याप्रकरणी कंगना यांच्याकडून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी ५ नोव्हेंबरला होणार आहे. पुढील सुनावणीवेळी कोर्ट कंगना यांच्या वक्तव्यावर कारवाई कशी करायची हे ठरवू शकते. मात्र, कंगना रणौत यांनी या विधानाबद्दल माफी मागितली आहे.

वकील अमित साहू यांनी २०२१ मध्ये कंगना यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. कंगना यांचे हे विधान लज्जास्पद असल्याचे साहू यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून स्वातंत्र्य मिळाले. कंगनाचे वक्तव्य म्हणजे देशातील शहीद जवानांचा अपमान आहे. हे चुकीचे आहे, असे वकील साहू यांनी म्हटलं होतं. यासोबतच वकील अमित साहू यांनी कंगनाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती कोर्टाला केली आहे.

‘भारताला १९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ती केवळ भीक होती. खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हाच मिळालं,’ असं विधान खासदार कंगना रणौत यांनी केले होते. कंगना यांच्या वक्तव्यानंतर विरोधक आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कंगना यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी देखील त्यावेळी होऊ लागली. मात्र त्यावरही कंगना यांनी १९४७ ला कुठे कोणतं युद्ध झालं होतं, असा सवाल केला होता. त्यानंतर वाढलेला वाद पाहून कंगनाने माफी मागितली.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाCourtन्यायालय