शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

“काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी; इंडिया आघाडीने पाठिंबा द्यावा”: अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:42 IST

Akhilesh Yadav News: इंडिया आघाडीने आम आदमी पक्षालाच पाठिंबा दिला पाहिजे, असा सल्ला अखिलेश यादव यांनी दिला आहे.

Akhilesh Yadav News: दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले आम आदमी पक्ष, काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. तर भाजपा जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून, इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, ठाकरे गटाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकले असते. इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या सारख्या नेत्यांच्या विरोधात ज्या प्रकारे प्रचार केला जात आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशी भूमिका ठाकरे गटाने स्पष्ट केली होती. यानंतर आता अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नाही, दिल्लीत ‘आप’ मजबूत म्हणून पाठीशी

दिल्ली विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने आम आदमी पक्षाला दिलेल्या पाठिंब्याबाबत अखिलेश यादव यांनी पहिल्यांच भाष्य केले. इंडिया आघाडी तुटलेली नाही. इंडिया आघाडी आकारास येत होती, तेव्हा सांगण्यात आले होते की, स्थानिक पक्ष जिथे मजबूत आहेत, तिथे त्यांना इंडिया आघाडीकडून समर्थन मिळेल, जेणेकरून स्थानिक पक्ष आणखी मजबूत होतील. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मजूबत आहे. म्हणूनच आम्ही आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंडिया आघाडीनेही आम आदमी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असा सल्ला अखिलेश यादव यांनी दिला. 

दिल्लीत भाजपाला केवळ आम आदमी पक्ष पराभूत करू शकतो

तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, इंडिया आघाडीची स्थापना झाली, तेव्हाच आम्ही ठरवले होते की, जिथे स्थानिक पक्ष मजबूत असेल, त्यांना भाजपाविरोधात उतरवायला हवे. दिल्लीत भाजपाला केवळ आम आदमी पक्ष पराभूत करू शकतो. त्यामुळेच आमचा आम आदमी पक्षाला पाठिंबा असेल, जो भाजपाला चितपट करू शकतो. आम्ही आम आदमी पक्षाला समर्थन न देऊन भाजपाची मदत का करू, असा सवालही बॅनर्जी यांनी विचारला. 

दरम्यान, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस हे सर्वच पक्ष काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. परंतु, दिल्ली विधानसभा निवडणुकीत या पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला नसून, हे सर्व पक्ष आम आदमी पक्षाच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तत्पूर्वी, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्षाला पाठिंबा  दिला होता. मात्र, आता दिल्ली निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेसऐवजी आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहे. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवAam Admi partyआम आदमी पार्टीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी