शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आदेश मिळताच पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ; सीमेवरील आव्हानांसाठी आम्ही सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 01:14 IST

भारत व चीन दरम्यान हॉटलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव असून, तो लवकरच प्रत्यक्षात येईल

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हे आपल्या देशाचे अविभाज्य अंग आहे, असा संकल्प आपल्या संसदेचा आहे. जर संसदेने आदेश दिला, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू, असे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केले. माणेकशॉ सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारतीय लष्कर हे भारतीय राज्यघटनेला प्राधान्य देते. गुप्तचर विभागाकडून आम्हाला विविध प्रकारची माहिती दररोज मिळत असते. त्या आधारेच त्यावर काम केले जाते. पाकिस्तानच्या बॅट या लष्करी तुकडीची माहिती आपल्याला मिळाली आणि बॅटच्या कारवाया आपण हाणून पाडल्या, असे नरवणे यांनी सांगितले.

लष्करप्रमुख म्हणाले की, पाकिस्तान व चीन या दोन्ही सीमांवरील आव्हाने परतवून लावण्यासाठी आपण सज्ज आहोत. अत्याधुनिक उपकरणांबरोबरच लष्कराला योग्य प्रशिक्षण देण्याचे कामही केले जात आहे. लष्करातील विविध विभागांशी समन्वय आणि एकत्रीकरण ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. आजच्या काळाची पावले ओळखून लष्कराला आधुनिक बनविले जात आहे. कुठल्याही बाबींची कमतरता नाही. अतिमहत्त्वाच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत.

महिलांची तुकडी लवकरच होईल दाखललष्करातील महिलांच्या १०० जणांच्या तुकडीचे प्रशिक्षण ६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. लवकरच ही तुकडी दाखल होईल. सैन्यामध्ये येण्यासाठी लाखो अर्ज येत आहेत. मात्र, आमच्या निकषात बसत असलेल्यांनाच संधी दिली जात आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.कोणत्याही आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर देऊभारत व चीन दरम्यान हॉटलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव असून, तो लवकरच प्रत्यक्षात येईल, असे सांगून मनोज नरवणे म्हणाले की, अपाचे हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर तर होवेत्झर आणि धनुष या आधुनिक तोफा मिळाल्याने लष्कर सशक्त झाले आहे. कुठल्याही प्रकारच्या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान