शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

'मंत्रीपदासाठी नाव आल्याचे समजताच मी रडायला लागले, हा सुखद धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:13 IST

मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश असून हे चारही नेते वेगळ्या पक्षांतून भाजपात आले आहेत.

ठळक मुद्देदिल्लीत आल्यानंतर मला मंत्रीपद मिळणार असल्याचं समजलं. खरं सांगू तर मी रडायलाच लागले होते, हे काय चाललंय, कसं चाललंय हे समजत नव्हतं. पण, हा सुखद धक्का होता, अशी प्रतिक्रिया नव्याने केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या डॉ. भारती पवार यांनी दिली

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामध्ये, भारती पवार आणि भागवत कराड यांच्या नावावर ऐनवेळी शिक्कामोर्तब झाले. त्यामुळेच, मंत्रीपद मिळणार हा सुखद धक्का होता, असे खासदार पवार यांनी म्हटले. 

मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश असून हे चारही नेते वेगळ्या पक्षांतून भाजपात आले आहेत. त्यामध्ये, नाशिकच्या दिंडोर मतदारसंघातून डॉ. भारती पवार खासदार बनल्या आहेत. द्रांक्षे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र, भारती पवार यांना मंत्रीपद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात भारती पवार यांनी हा सुखद धक्का असल्याचं म्हटलं.   

सुखद धक्का होता, मला रडायलाच आलं

दिल्लीत आल्यानंतर मला मंत्रीपद मिळणार असल्याचं समजलं. खरं सांगू तर मी रडायलाच लागले होते, हे काय चाललंय, कसं चाललंय हे समजत नव्हतं. पण, हा सुखद धक्का होता, अशी प्रतिक्रिया नव्याने केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या डॉ. भारती पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. आमच्यासारख्य सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न नवीन मंत्रिमंडळात झालं आहे. माझ्यासह अनेक महिलांना संधी देण्यात आली. भाजपमध्ये काहीही होऊ शकतं, काम करणाऱ्यांना संधी मिळू शकते, हा संदेशही या निवडीतून देण्यात आल्याचं पवार यांनी म्हटलं. 

मोदींनी मराठीत संवाद साधला

मोदींसमवेतच्या बैठकीत संध्याकाळच्या शपथविधीसंदर्भात सांगण्यात आले. यावेळी मोदींनी आमच्याशी संवाद साधला, माझ्याशी बोलताना ते मराठीत बोलले. काय कसं काय, महाराष्ट्राचं काय चाललंय.. असा प्रश्न मोदींनी विचारला. मोदींनी आपुलकीने विचारपूस केली, असेही भारती पवार यांनी सांगितले. 

सासऱ्यांच्या पुण्याईने मंत्रीपद मिळाले

मी डॉक्टरकी करताना कधीही राजकारणाचा विचार केला नव्हता. पण, माझे सासरे स्वर्गीय एटी पवार हे 40 वर्षे आमदार होते. राज्यात माजी मंत्री राहिले आहेत, कदाचित त्यांच्या पुण्यामुळेच मी आज हा दिवस पाहत आहे. त्यांनी नेहमीच समाजसेवीची शिकवण दिलीय, लोकांची कामे जास्त प्रगल्भतेनं करा, हेच शिकवल्याचं डॉ. पवार यांनी म्हटलं. मी सुरुवातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीवर काम केलंय, स्थायी समितीवरही काम केलंय. आता खासदार आणि मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून तेही काम निष्ठने करेन, असे पवार यांनी म्हटले.     शिक्षण- एम.बी.बी.एस.

* जन्म दि.- १३ सप्टेंबर १९७८* जन्मगाव- नरूळ, ता. कळवण (नाशिक)* माहेरचे नाव- डॉ. भारती किसन बागूल* प्राथमिक शिक्षण- मुंबई* माध्यमिक शिक्षण- नाशिक* आवड, निवड, छंद- समाजसेवा व वाचन

* राजकीय वाटचाल- पती प्रवीण अर्जुन पवार यांचे भक्कम पाठबळ लाभले, माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांच्या सहवासात राजकीय प्रवासाला सुरुवात. जि.प.च्या उमराणे, मानूर गटातून दोन वेळा विजयी, २०१४ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पराभव, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी.* भविष्यातील वाटचाल- सामाजिक बांधिलकी जपत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार* संकल्प- केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा वापर करून मतदारसंघाचा कायापालट करणार. पाणी, रस्ते, वीज यासह मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करणार. 

टॅग्स :ministerमंत्रीBJPभाजपाdindori-acदिंडोरीNarendra Modiनरेंद्र मोदी