शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पक्ष सावरण्यासाठी सोनिया गांधींच्या हालचाली; प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये आले नाहीत कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 06:49 IST

उदयपूरमधील चिंतन शिबिरापूर्वी प्रदेश शाखांत होणार फेरबदल, २०२० मध्ये नेतृत्वाच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या असंतुष्ट गटातील नेत्यांना सामावून घेणे, हा  कायाकल्पाचा मुख्य घटक आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी  पक्षाची घडी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.  निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबतची चर्चा फिस्कटली असली, तरी  मे महिन्याच्या मध्यात उदयपूर येथे होणाऱ्या नव संकल्प चिंतन शिबिरापूर्वीच  प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याचे ठरविले आहे.

२०२० मध्ये नेतृत्वाच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या असंतुष्ट गटातील नेत्यांना सामावून घेणे, हा  कायाकल्पाचा मुख्य घटक आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी विदेश दौऱ्यावर असतानाही सोनिया गांधी चर्चा करून नवीन नियुक्त्या करीत आहेत. स्व. वीरभद्र सिंह यांची  पत्नी आणि लोकसभा सदस्य प्रतिभा सिंह यांची त्यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, तर बुधवारी हरयाणा प्र्रदेश काँग्रेस समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून उदय भान यांची नियुक्ती केली. वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होत असलेल्या हिमाचल प्रदेशसाठी आनंद शर्मा यांची निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संधी मिळताच आनंद शर्मा  राज्यसभेवर घेण्यासाठी पक्ष प्रयत्न करील, असेही संकेत आहेत. अलीकडेच आनंद शर्मा यांनी पक्षाध्यक्षांची भेट घेतली होती, तर भूपिंदर सिंह हुडा हेही काही आठवड्यापूर्वी राहुल गांधी यांना भेटले होते. या बैठकीनंतरच कुमारी शैलजा यांनी हरयाणा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हुडा यांच्याशी निष्ठावंत असलेले उदय भान यांची प्रदेशाध्यपदी नियुक्ती करण्यात आली.

उदय भान हे माजी आमदार स्व. गया लाल यांचे पुत्र आहेत. त्यांच्यामुळेच ‘आया राम, गया राम’ हा वाक्प्रचार  हरयाणात प्रसिद्ध झाला. गया लाल यांनी १९६७ मध्ये एकाच दिवसात तीनवेळा पक्ष बदलले होते.  हरयाणा प्रदेश काँग्रेस समितीआधी पंजाब प्रदेश काँग्रेस समितीत फेरबदल करण्यात  आले असून,  अन्य काही राज्यातील प्रदेशाध्यक्षांंना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांचा विचार करून गुलाम नबी आझाद यांनाही महत्त्वाची जबाबदारी दिली येईल. 

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये आले नाहीत कारण... 

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत १० दिवस चर्चा केल्यानंतरही काँग्रेसमध्ये न येण्यामागील कारण महत्वाचे आहे. प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद द्यावे अशी सूचना केली आणि पक्षांतर्गत सुधारणांसाठी पूर्ण स्वातंत्र्य मला मिळावे, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, सोनिया गांधी या राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष बनवू इच्छितात. यामुळे प्रशांत किशोर हे पक्षात यायच्या आधीच बाहेर पडले.मंगळवार सकाळपर्यंत सगळे काही व्यवस्थित होते. सोमवारी सोनिया गांधी यांनी राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘एम्पावर्ड ॲक्शन ग्रुप २०२४’ तयार केल्याची घोषणा केली व प्रशांत किशोर यांना या गटात येण्याचे आवाहन केले होते. त्यांनी प्रस्ताव नाकारून म्हटले की,“काँग्रेसला माझी नव्हे तर चांगल्या नेतृत्वाची गरज आणि मोठ्या प्रमाणावर सुधारणांची गरज आहे.” अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पक्षाने प्रशांत यांना केलेले आवाहन आणि ते त्यांनी नाकारल्याची माहिती ट्विटरवर दिल्यानंतर तर्कवितर्क सुरू झाले.

मोदींनी बेरोजगारीकडे लक्ष द्यावे - राहुल गांधीकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘हेट इन इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ एकत्र नांदू शकत नाहीत, अशा शब्दात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवर टीका केली आणि मोदींनी देशातील बेरोजगारीकडे लक्ष द्यावे, असे म्हटले. देशातून काही जागतिक दर्जाच्या कंपन्या निघून गेल्याची पार्श्वभूमी या टीकेला आहे. गांधी यांनी देशातील बेरोजगारीचा उल्लेख करून मोदी यांनी हा बेरोजगारीचे महाप्रचंड संकट दूर करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे म्हटले. सात जागतिक ब्रँड्स, नऊ कारखाने, ६४९ डीलरशिप्स, ८४ हजार रोजगार भारतातून निघून गेले आहेत, असे गांधी म्हणाले.

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी