शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 21:42 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आली आहे.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) रायबरेलीतून (Raebareli) निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झालीये. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढविण्याबाबतचा प्रस्ताव तेलंगणा काँग्रेसने मांडला आहे. तेलंगणातील मेडक मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील याच जागेवरून निवडणूक लढवली होती. आता सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले आहे. 

रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्लासोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेली हा जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता, ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आली. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणूक इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडे आहे.

रायबरेलीतून कोण लढणार?सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा सोडली तर त्यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी अलीकडेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यापूर्वी राहुल गांधी या मतदारसंघातून तीनदा खासदार झाले आहेत. राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याबाबत काँग्रेसने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. पण, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या डाव्यांनी वायनाड जागेवर दावा केला आहे. पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे असेल.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाUttar Pradeshउत्तर प्रदेश