शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघ सोडणार? 'या' राज्यात निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 21:42 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी आली आहे.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) रायबरेलीतून (Raebareli) निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झालीये. सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढविण्याबाबतचा प्रस्ताव तेलंगणा काँग्रेसने मांडला आहे. तेलंगणातील मेडक मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील याच जागेवरून निवडणूक लढवली होती. आता सोनिया गांधींनी तेलंगणातून निवडणूक लढवावी, असा ठराव मंजूर केल्याचे काँग्रेस नेते मधु यक्षी गौर यांनी सांगितले आहे. 

रायबरेली काँग्रेसचा बालेकिल्लासोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेली हा जागा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता, ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आली. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणूक इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडे आहे.

रायबरेलीतून कोण लढणार?सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा सोडली तर त्यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी अलीकडेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यापूर्वी राहुल गांधी या मतदारसंघातून तीनदा खासदार झाले आहेत. राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याबाबत काँग्रेसने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. पण, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या डाव्यांनी वायनाड जागेवर दावा केला आहे. पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे असेल.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाUttar Pradeshउत्तर प्रदेश