शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

सोनिया गांधीच राहणार काँग्रेस अध्यक्ष; गांधी कुटुंबीयांविना पक्ष विखुरण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 08:00 IST

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर पक्षात नवे राजकीय समीकरण उदयास येत आहे. राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचे नसल्यास सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावे

आदेश रावलनवी दिल्ली :

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्यानंतर पक्षात नवे राजकीय समीकरण उदयास येत आहे. राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचे नसल्यास सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावे, असे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. पक्ष अडचणीत असताना गांधी परिवाराच्या सदस्याने नेतृत्व सोडल्यास पक्ष विखुरला जाऊ शकतो, अशी भीती या नेत्यांना आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी इच्छा पक्षातील नेत्यांची होती. मात्र, त्यांनी नकार दिल्यानंतर नव्या अध्यक्षाचा शोध सुरू झाला. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपद दिले जावे, अशी भूमिका पक्षातील एका गटाने घेतली होती. मात्र, गांधी कुटुंबीयांच्या रणनितीकारांनी त्यांची समजूत काढली. पक्ष सध्या अडचणीत आहे. अशा वेळी गांधी कुटुंबीयाने पक्षनेतृत्व सोडायला नको. अन्यथा पक्ष विखुरला जाईल. 

निवडणुकीची तारीख लवकरचकाँग्रेसची समिती लवकरच अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करणार आहे. २० सप्टेंबरपूर्वी पक्षाचा नवा अध्यक्ष निवडायचा आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला असला तरीही ते ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.

दोन उपाध्यक्षांबाबत विचार सुरूसोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर ज्येष्ठ किंवा तरुण नेत्यांपैकी कोणालाच आक्षेप नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीचा विचार करता दोन उपाध्यक्ष निवडण्याचा विचार पक्षात करण्यात येत आहे. त्यात एक दक्षिण भारतातून तर एक उत्तर भारतातून असावा, असा प्रस्ताव आहे. दक्षिणेकडून मल्लिकार्जुन खर्गे आणि रमेश चेन्नीथला तर उत्तरेकडून अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे.

‘भारत जोडो यात्रे’साठी एकत्र यायेत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’साठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले. स्वयंसेवी संस्थांनी मात्र काँग्रेसला असे कोणतेही आश्वासन तूर्तास दिले नाही.

काँग्रेस पक्षातर्फे येत्या ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. देशाला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकारण व जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी काँग्रेसने ही भारत जोडो यात्रा काढण्याचे ठरविले आहे. या यात्रेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वत: सहभागी होणार आहेत. देशभर जवळपास ३५०० किलोमीटर फिरणाऱ्या या यात्रेत १५० कार्यकर्ते पूर्णवेळ राहणार आहेत. केंद्रातील सरकार देशात विद्वेष पसरवीत आहे. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. ही स्थिती लोकांना समजावून सांगण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली जाणार आहे. 

या यात्रेत समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी सहभागी व्हावे, यासाठी राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत बैठक घेतली. या चर्चेनंतर स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सहभागाचे आश्वासन दिले नाही. परंतु, या यात्रेचे स्वागत करणार असल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधी