शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

VIDEO: राहुल गांधी अध्यक्ष झाल्याच्या आनंदात फटाके फोडणा-यांवर चिडल्या सोनिया गांधी, मधेच थांबवलं भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 13:12 IST

राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतली.  काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली.

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्य़क्षपदाचा पदभार स्विकारला. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करत फटाके फोडण्यास सुरुवात केली. मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी भाषणासाठी उभ्या राहिल्या तेव्हादेखील फटाके वाजणं सुरुच होतं. सोनिया गांधी यांनी तरीदेखील भाषण करण्याचा प्रयत्न केला. पण फटाक्यांच्या आवाजात भाषण करणं शक्य नसल्याने त्यांनी मधेच भाषण थांबवलं आणि फटाके फोडणं बंद करायला सांगितलं. पण यानंतरही थोड्या वेळाने पुन्हा तशीच परिस्थिती झाली होती. अखेर फटाक्यांचा आवाज कमी झाल्यानंतर त्यांनी भाषण सुरु केलं.

राहुल गांधी यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतली.  काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र देत, सूत्रं सोपवली. यावेळी माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल सांगितलं. तसंच भाजपा सरकारवरही जोरदार टीका केली. 

'राहुल गांधी माझा मुलगा असल्याने त्याचं कौतुक करणं चुकीचं ठरेल. लहानपाणासून त्याने दुख: सोसलं आहे. राहुलने राजकारणात आल्यावर अशा भयंकर व्यक्तीचा सामना केला ज्याने त्याला अजून निर्भय आणि मजबूत केलं आहे. मला त्याच्या सहनशीलतेचा गर्व वाटतो. मला पुर्ण विश्वास आहे की पक्षाचं नेतृत्व तो योग्य पद्धतीने करेल', असा विश्वास सोनिया गांधींनी व्यक्त केला.

20 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा हाती घेताना माझे हात थरथरत होते अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. 'ज्या कुटुंबात मी आले ते एक क्रांतिकारी कुटुंब होतं. इंदिरा गांधी त्याच कुटुंबाच्या सदस्य होत्या. इंदिरा गांधींनी मला मुलीप्रमाणे वागवलं.  भारताच्या संस्कृतीशी ओळख करुन दिली. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आई दुरावल्याची माझी भावना होती. त्यानंतर माझं आयुष्य पालटलं', हे सांगताना सोनिया गांधी भावूक झाल्या होत्या. 

'इंदिरांच्या हत्येनंतर सात वर्षांनी माझ्या पतीचीही हत्या झाली, माझा आधार माझ्यापासून हिसकावला. पक्ष अडचणीत असल्याने मला पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज ऐकू आला. आपलं कर्तव्य समजत मी राजकारणात आले', असं त्या म्हणाल्या.

'मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली त्यावेळी आमच्याकडे फक्त 3 राज्य होती, केंद्राची सत्ता दूर होती. पण नंतर आम्ही डझनपेक्षा जास्त राज्यात सत्ता मिळवली. जेवढं मोठं आव्हान आज आपल्यासमोर आहे, तेवढं कधीच नव्हतं. आव्हानं खूप आहेत, पण आम्ही घाबरणारे नाहीत, झुकणारे नाहीत', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस