शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सोनिया गांधींनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 15:41 IST

हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या वक्तव्यांवर लक्ष द्यावे, आम्हाला राजधर्म शिकवू नये, असा टोला प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्षांना लगावला आहे. 

दिल्लीत झालेल्या हिंसेनंतर सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की,  सोनिया गांधी यांनी आरपारच्या गोष्टी करू नये. काँग्रेस पक्ष गुरुवारी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेला होता. आम्हाला राजधर्माविषयी सांगण्यात येत आहे. या राजधर्मावरून मला काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांना काही सवाल विचारायचे आहे, असं प्रसाद म्हणाले.

हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले.

दरम्यान इंदिराजींनी युगांडाची मदत केली होती. राजीव गांधी यांनी तमिळ लोकांची मदत केली होती. तर मनमोहन सिंग यांनी नागरिकता मिळावी तसेच अशोक गेहलोत यांनी शिवराज पाटील आणि अडवाणी यांना पत्र लिहून नागरिकता मिळावी, अशी मागणी केली होती. एनपीआर काँग्रेस सरकारनेच सुरू केले आहे. तुम्ही केलं तर ठीक आणि आम्ही केलं लोकांना भडकवणार का, असा प्रश्न त्यांनी सोनिया गांधी यांना विचारला.