शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सोनिया गांधींनी आम्हाला राजधर्म शिकवू नये; रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 15:41 IST

हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सोनिया गांधी यांनी आपल्या वक्तव्यांवर लक्ष द्यावे, आम्हाला राजधर्म शिकवू नये, असा टोला प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्षांना लगावला आहे. 

दिल्लीत झालेल्या हिंसेनंतर सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याला प्रत्युत्तर देताना रविशंकर प्रसाद म्हणाले की,  सोनिया गांधी यांनी आरपारच्या गोष्टी करू नये. काँग्रेस पक्ष गुरुवारी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेला होता. आम्हाला राजधर्माविषयी सांगण्यात येत आहे. या राजधर्मावरून मला काँग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांना काही सवाल विचारायचे आहे, असं प्रसाद म्हणाले.

हा कोणता राजधर्म आहे की सगळे पलटले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ? रामलीला मैदानात तुम्हीच ही आरपारची लढाई असल्याचे म्हटलं होतं. ही कोणती भाषा आहे, असा असंही त्यांनी विचारले.

दरम्यान इंदिराजींनी युगांडाची मदत केली होती. राजीव गांधी यांनी तमिळ लोकांची मदत केली होती. तर मनमोहन सिंग यांनी नागरिकता मिळावी तसेच अशोक गेहलोत यांनी शिवराज पाटील आणि अडवाणी यांना पत्र लिहून नागरिकता मिळावी, अशी मागणी केली होती. एनपीआर काँग्रेस सरकारनेच सुरू केले आहे. तुम्ही केलं तर ठीक आणि आम्ही केलं लोकांना भडकवणार का, असा प्रश्न त्यांनी सोनिया गांधी यांना विचारला.