शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:02 IST

हिंसाचाराला केंद्र, ‘आप’ सरकार जबाबदार

नवी दिल्ली : दिल्लीतील जातीय हिंसाचाराला केंद्रातील आणि अरविंद केजरीवाल यांचे सरकार जबाबदार असून, या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केली.काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘दिल्लीतील हिंसाचारामागे कट-कारस्थान आहे. या कटाचा अनुभव दिल्लीतील निवडणुकीत आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचारात भीती आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या भाषणांतूनच आला होता.दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शांतता राखण्यात अपयशी ठरले आहेत.’’ कार्यकारिणी समितीच्या बैठकीने राजधानीतील परिस्थिती ही गंभीर असून, तातडीने कारवाईची गरज असल्याचा ठराव संमत केला.मोर्चा लांबणीवरदरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रपती भवनवर काढण्यात येणारा आपला मोर्चा गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकला आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.उच्चस्तरीय चौकशी करा-मायावतीलखनौ : दिल्लीतील हिंसाचाराचा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी निषेध करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. दिल्ली व केंद्र सरकारने हा हिंसाचार गांभीर्याने घेऊन गुन्हेगारांना कठोर शासन करावे, असे मायावती यांनी हिंदी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले.दंगलीवर राजकारण करू नका; जावडेकरांचे काँग्रेसला प्रत्युत्तरदंगल कुणी भडकवली यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जाहीर वक्तव्यामुळेच दंगल भडकल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस अध्यक्षांचे वक्तव्य अत्यंत निंदाजनक आहे. याक्षणी राजकारण नको. पोलिसांचे मनोधैर्य त्यामुळे खच्ची होते, अशी टीका जावडेकर यांनी केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. त्यावर जावडेकर म्हणाले की, दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृहमंत्रालयाने प्रयत्न केले. अमित शहा यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते त्यात होते. सध्या काँग्रेसकडे कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे घाणेरडे राजकारण सुरू आहे.दिल्लीतील परिस्थितीवर युनोचे बारकाईने लक्षसंयुक्त राष्ट्रे : नवी दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेज यांचे बारकाईने लक्ष असून, आंदोलकांना शांतपणे निदर्शने करू दिली पाहिजेत व सुरक्षा दलांनी संयम पाळला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला, असे गुटेरेज यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारेक यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यावरून ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबलसह २० जण ठार तर १५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे लक्ष आहे का, असे विचारले असता दुजारेक म्हणाले, ‘‘आम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’’ईशान्य दिल्लीत लष्कर तैनात करा- संजय सिंहहिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे लष्कराला तैनात करावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह आणि गोपाल राय यांनी बुधवारी येथे सरकारला केले.वार्ताहरांशी बोलताना सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वारंवार मागणी करूनही सीमा भाग बंद का केले गेले नाहीत?. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘आप’ सरकार सर्व काही करीत असल्याचा दावा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे केवळ औपचारिकतेसाठी बैठका घेऊ शकत नाहीत.‘गृहमंत्री जागे व्हा, एक उपचार म्हणून तुम्ही बैठका बोलावत आहात आणि तुमच्या पक्षाचे लोक काय करीत आहेत? ते तर हिंसाचाराला चिथावणी देत आहेत. उपचार म्हणून बैठका घेतल्यामुळे काहीही साध्य होणार नाही, असे संजय सिंह म्हणाले.हिंसाचाराला चिथावणी देणाºया लोकांना कोणताही धर्म नाही. मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक दिल्लीत हिंसाचाराला चिथावणी देण्यास येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधी