शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:02 IST

हिंसाचाराला केंद्र, ‘आप’ सरकार जबाबदार

नवी दिल्ली : दिल्लीतील जातीय हिंसाचाराला केंद्रातील आणि अरविंद केजरीवाल यांचे सरकार जबाबदार असून, या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केली.काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘दिल्लीतील हिंसाचारामागे कट-कारस्थान आहे. या कटाचा अनुभव दिल्लीतील निवडणुकीत आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचारात भीती आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या भाषणांतूनच आला होता.दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शांतता राखण्यात अपयशी ठरले आहेत.’’ कार्यकारिणी समितीच्या बैठकीने राजधानीतील परिस्थिती ही गंभीर असून, तातडीने कारवाईची गरज असल्याचा ठराव संमत केला.मोर्चा लांबणीवरदरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रपती भवनवर काढण्यात येणारा आपला मोर्चा गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकला आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.उच्चस्तरीय चौकशी करा-मायावतीलखनौ : दिल्लीतील हिंसाचाराचा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी निषेध करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. दिल्ली व केंद्र सरकारने हा हिंसाचार गांभीर्याने घेऊन गुन्हेगारांना कठोर शासन करावे, असे मायावती यांनी हिंदी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले.दंगलीवर राजकारण करू नका; जावडेकरांचे काँग्रेसला प्रत्युत्तरदंगल कुणी भडकवली यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जाहीर वक्तव्यामुळेच दंगल भडकल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस अध्यक्षांचे वक्तव्य अत्यंत निंदाजनक आहे. याक्षणी राजकारण नको. पोलिसांचे मनोधैर्य त्यामुळे खच्ची होते, अशी टीका जावडेकर यांनी केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. त्यावर जावडेकर म्हणाले की, दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृहमंत्रालयाने प्रयत्न केले. अमित शहा यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते त्यात होते. सध्या काँग्रेसकडे कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे घाणेरडे राजकारण सुरू आहे.दिल्लीतील परिस्थितीवर युनोचे बारकाईने लक्षसंयुक्त राष्ट्रे : नवी दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेज यांचे बारकाईने लक्ष असून, आंदोलकांना शांतपणे निदर्शने करू दिली पाहिजेत व सुरक्षा दलांनी संयम पाळला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला, असे गुटेरेज यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारेक यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यावरून ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबलसह २० जण ठार तर १५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे लक्ष आहे का, असे विचारले असता दुजारेक म्हणाले, ‘‘आम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’’ईशान्य दिल्लीत लष्कर तैनात करा- संजय सिंहहिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे लष्कराला तैनात करावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह आणि गोपाल राय यांनी बुधवारी येथे सरकारला केले.वार्ताहरांशी बोलताना सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वारंवार मागणी करूनही सीमा भाग बंद का केले गेले नाहीत?. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘आप’ सरकार सर्व काही करीत असल्याचा दावा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे केवळ औपचारिकतेसाठी बैठका घेऊ शकत नाहीत.‘गृहमंत्री जागे व्हा, एक उपचार म्हणून तुम्ही बैठका बोलावत आहात आणि तुमच्या पक्षाचे लोक काय करीत आहेत? ते तर हिंसाचाराला चिथावणी देत आहेत. उपचार म्हणून बैठका घेतल्यामुळे काहीही साध्य होणार नाही, असे संजय सिंह म्हणाले.हिंसाचाराला चिथावणी देणाºया लोकांना कोणताही धर्म नाही. मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक दिल्लीत हिंसाचाराला चिथावणी देण्यास येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधी