शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

गृहमंत्री शहांनी राजीनामा द्यावा; सोनिया गांधी यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:02 IST

हिंसाचाराला केंद्र, ‘आप’ सरकार जबाबदार

नवी दिल्ली : दिल्लीतील जातीय हिंसाचाराला केंद्रातील आणि अरविंद केजरीवाल यांचे सरकार जबाबदार असून, या हिंसाचाराची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बुधवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केली.काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘दिल्लीतील हिंसाचारामागे कट-कारस्थान आहे. या कटाचा अनुभव दिल्लीतील निवडणुकीत आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचारात भीती आणि द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या भाषणांतूनच आला होता.दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शांतता राखण्यात अपयशी ठरले आहेत.’’ कार्यकारिणी समितीच्या बैठकीने राजधानीतील परिस्थिती ही गंभीर असून, तातडीने कारवाईची गरज असल्याचा ठराव संमत केला.मोर्चा लांबणीवरदरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रपती भवनवर काढण्यात येणारा आपला मोर्चा गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकला आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.उच्चस्तरीय चौकशी करा-मायावतीलखनौ : दिल्लीतील हिंसाचाराचा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी बुधवारी निषेध करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. दिल्ली व केंद्र सरकारने हा हिंसाचार गांभीर्याने घेऊन गुन्हेगारांना कठोर शासन करावे, असे मायावती यांनी हिंदी भाषेत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले.दंगलीवर राजकारण करू नका; जावडेकरांचे काँग्रेसला प्रत्युत्तरदंगल कुणी भडकवली यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जाहीर वक्तव्यामुळेच दंगल भडकल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस अध्यक्षांचे वक्तव्य अत्यंत निंदाजनक आहे. याक्षणी राजकारण नको. पोलिसांचे मनोधैर्य त्यामुळे खच्ची होते, अशी टीका जावडेकर यांनी केली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. त्यावर जावडेकर म्हणाले की, दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृहमंत्रालयाने प्रयत्न केले. अमित शहा यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते त्यात होते. सध्या काँग्रेसकडे कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे घाणेरडे राजकारण सुरू आहे.दिल्लीतील परिस्थितीवर युनोचे बारकाईने लक्षसंयुक्त राष्ट्रे : नवी दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेज यांचे बारकाईने लक्ष असून, आंदोलकांना शांतपणे निदर्शने करू दिली पाहिजेत व सुरक्षा दलांनी संयम पाळला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला, असे गुटेरेज यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारेक यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यावरून ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात पोलीस कॉन्स्टेबलसह २० जण ठार तर १५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दिल्लीतील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राचे लक्ष आहे का, असे विचारले असता दुजारेक म्हणाले, ‘‘आम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवून आहोत.’’ईशान्य दिल्लीत लष्कर तैनात करा- संजय सिंहहिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे लष्कराला तैनात करावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह आणि गोपाल राय यांनी बुधवारी येथे सरकारला केले.वार्ताहरांशी बोलताना सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वारंवार मागणी करूनही सीमा भाग बंद का केले गेले नाहीत?. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘आप’ सरकार सर्व काही करीत असल्याचा दावा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे केवळ औपचारिकतेसाठी बैठका घेऊ शकत नाहीत.‘गृहमंत्री जागे व्हा, एक उपचार म्हणून तुम्ही बैठका बोलावत आहात आणि तुमच्या पक्षाचे लोक काय करीत आहेत? ते तर हिंसाचाराला चिथावणी देत आहेत. उपचार म्हणून बैठका घेतल्यामुळे काहीही साध्य होणार नाही, असे संजय सिंह म्हणाले.हिंसाचाराला चिथावणी देणाºया लोकांना कोणताही धर्म नाही. मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक दिल्लीत हिंसाचाराला चिथावणी देण्यास येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहाSonia Gandhiसोनिया गांधी