शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ‘सीएए’ रद्द करण्याची सोनिया गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 03:29 IST

निदर्शकांना दिला पाठिंबा

शीलेश शर्मा नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) मोदी सरकारने रद्दबातल करावा तसेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरची (एनपीआर) प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला काँग्रेसचा पाठिंबा असेल असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, धर्माच्या आधारे भेदभाव करून नागरिकत्व दुरुस्ती कायदा बनविण्यात आला आहे. लोकांमध्ये फुट पाडण्याचे कारस्थान मोदी सरकारने रचले आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी व राज्यघटना वाचविण्यासाठी जे रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत त्या प्रत्येकाच्या पाठीशी काँग्रेस भक्कमपणे उभी राहिल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांवर भाजप पोलिसांच्या मदतीने अत्याचार करत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली व इतर राज्यांत असे प्रकार घडले आहेत. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्यामागील दोषी व्यक्तींवर नायब राज्यपालांनी कडक कारवाई करावी. या हल्ल्याच्या चौकशीसाठी एक समिती नेमावी.

सोनिया गांधी यांनी सांगितले की, एनआरसी, एनपीआर, सीएए एकमेकांशी जोडून एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्याचे कारस्थान मोदी सरकारने रचले आहे. त्याला काँग्रेसचा विरोध आहे. देशातील संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याकरिता योग्य उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती मोदी सरकारमध्ये नाही.

काँग्रेस कार्यकारिणीच्या सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले की, मोदी सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांवर हल्ले चढविले जात आहेत. बहुमताच्या बळावर सरकार जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी