शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ‘सीएए’ रद्द करण्याची सोनिया गांधींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 03:29 IST

निदर्शकांना दिला पाठिंबा

शीलेश शर्मा नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) मोदी सरकारने रद्दबातल करावा तसेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरची (एनपीआर) प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला काँग्रेसचा पाठिंबा असेल असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, धर्माच्या आधारे भेदभाव करून नागरिकत्व दुरुस्ती कायदा बनविण्यात आला आहे. लोकांमध्ये फुट पाडण्याचे कारस्थान मोदी सरकारने रचले आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी व राज्यघटना वाचविण्यासाठी जे रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत त्या प्रत्येकाच्या पाठीशी काँग्रेस भक्कमपणे उभी राहिल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांवर भाजप पोलिसांच्या मदतीने अत्याचार करत आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली व इतर राज्यांत असे प्रकार घडले आहेत. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्यामागील दोषी व्यक्तींवर नायब राज्यपालांनी कडक कारवाई करावी. या हल्ल्याच्या चौकशीसाठी एक समिती नेमावी.

सोनिया गांधी यांनी सांगितले की, एनआरसी, एनपीआर, सीएए एकमेकांशी जोडून एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्याचे कारस्थान मोदी सरकारने रचले आहे. त्याला काँग्रेसचा विरोध आहे. देशातील संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याकरिता योग्य उपाययोजना करण्याची इच्छाशक्ती मोदी सरकारमध्ये नाही.

काँग्रेस कार्यकारिणीच्या सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीनंतर पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले की, मोदी सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांवर हल्ले चढविले जात आहेत. बहुमताच्या बळावर सरकार जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी