शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल! सोनिया गांधींनी 'या' नेत्यांकडे सोपवली 5 राज्यांची जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 12:20 IST

Congress : काँग्रेसने बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पाच नेत्यांची नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आणि निवडणूक पराभवानंतर संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे.

जयराम रमेश यांच्याकडे मणिपूर आणि अजय माकन यांना पंजाबमधील परिस्थितीचे आकलन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तर राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना गोव्यातील परिस्थितीचे आकलन करण्यास सांगितले आहे. याशिवाय, काँग्रेस नेते जितेंद्र सिंह उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन करतील. तसेच, अविनाश पांडे यांना उत्तराखंडमधील परिस्थितीचे आकलन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

काँग्रेसने बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पाच नेत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच, उमेदवारांकडून आणि महत्त्वाच्या नेत्यांना राज्यांमध्ये संघटनात्मक बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचा दारूण पराभवदरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या भाजपशासित राज्यांपैकी एकही राज्य काँग्रेसला जिंकता आले नाही, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने पराभव केल्यामुळे येथील सत्ता गमावली आहे. यापूर्वी 15 मार्च रोजी सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगितले होते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस