इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडात सातत्याने नव-नवे खुलासे होताना दिसत आहेत. अशा गोष्टी समोर येत आहेत, ज्या वाचून धक्का बसत आहे. आता या प्रकरणात, राजा रघुवंशीच्या मित्राने एक मोठा खुलासा केला आहे. राजाचा मित्र आकाश त्याच्या सर्वात प्रिय मित्राच्या जाण्याने अत्यंत दुःखी आहे आणि त्याचे तोंडभरून कौतुक करत आहे. दरम्यान, न्यूज १८ सोबत बोलताना त्याने एक नवा खुलासा केला आहे. 'सोनम रघुवंशी लग्नापूर्वी राजासोबत फोनवर बोलण्यास टाळाटाळ करत होती. वेगवेगळे बहाणे शोधत होती. ती स्वतःला अत्यंत बिझी दाखवत होती. पण राजा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत तिच्याशी बोलत होता.
आकाशने न्यूज१८ इंडियासोबत बोलताना राजा रघुवंशीचे प्रचंड कौतुक केले. राजाचे कौतुक करताना तो म्हणाला, राजा अत्यंत शांत आणि दुसऱ्यांना मदत करणारा माणूस होता. दरम्यान, आकाशने एक नवा खुलासा करत सांगितले की, लग्नापूर्वी सोनम आपल्यासोबत बोलत नाही, असे राजा रघुवंशी आपल्याला सांगत होता. राजा जेव्हा तिला फोन करायचा, तेव्हा ती बिझी असल्याचे सांगत होती. यावर राजा काही हरकत नाही, असे म्हणायचा. पण तो कधीही पत्नी सोनमबद्दल वाईट बोलला नाही. कदाचित सोनम बिझी असेलही, असेच राजाला वाटत होते. मात्र, तीचे राज सोबत प्रेमसंबंध असल्याचा संकेत अथवा हिंट त्याला समजली नाही.
आकाश पुढे म्हणाला, राजा फार चांगला मुलगा होता. तो सर्वांशी हसतमुखाने बोलायचा. सर्वांना मदत करायचा. सोनम देखील एक चांगलीच व्यक्ती होती. पम तिने असे का केले, समजत नाही. सोनमला काल गाझीपूरमधील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली होती आणि तिच्यासह एकूण ४ आरोपी होते. यात एक नाव तिचा प्रियकर राज कुशवाहाचेही आहे.