शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 6:33 AM

पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला.

श्रीनगर : पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले असले, तरी मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.भारतात घातपात घडवून आणण्यासाठी ८ दहशतवादी काश्मीरमार्गे घुसणार असल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलांचे जवान सतर्क झाले होते. हे अतिरेकी घुसण्याच्या प्रयत्नात असताना, त्यात अडथळे येऊ नयेत, म्हणून पाकिस्तानी लष्कराने भारतीय सीमेवर निष्कारण गोळीबार सुरू केला. त्या वेळी मेजर राणे व अन्य जवानांनी या अतिरेक्यांना घुसता येऊ नये, म्हणून जिवाची बाजी लावली. त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला तोंड देतानाच दहशतवाद्यांना अडवण्याचेही प्रयत्न सुरू केले. या अतिरेक्यांनीही जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला त्याच पद्धतीने मेजर राणे व त्यांच्या सहकाºयांनी प्रत्युत्तर दिले. त्यात चार अतिरेकी ठार झाले, तर उरलेले चौघे जण बहुधा पळून गेले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून, कारवाईनंतर गुरेज सेक्टरमधील सर्वच नियंत्रण रेषांपाशी व परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यापैकी दोन अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. >घुसखोरी रोखताना जिवाची बाजीकौस्तुभ हे मीरा रोडचे (ठाणे) राहणारे. त्यांचे काका प्रताप राणे यांनी सांगितले की, एप्रिलमध्येच कौस्तुभ भेटून गेला होता. सीमेवर उंचावर असल्याने संपर्कव्हायचा नाही, पण कॅम्पमध्ये आला की, रात्री २-३ वाजता तो फोन करून मी ठीक आहे, असे कळवायचा. तेवढेच त्याच्याशी घरच्यांचे बोलणे व्हायचे. गस्तीवरून यायला उशीर झाला की, जेवण संपलेले असायचे. २५ जुलैला त्याच्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.>सहा महिन्यांत १३३ प्रयत्न; ६९ अतिरेकी घुसलेनवी दिल्ली : या वर्षी जानेवारी ते जून या काळात पाकिस्तानातून ६९ अतिरेकी भारतात घुसले. वर्षभरात घुसखोरीचे एकूण १३३ प्रयत्न झाले. जवानांनी १४ घुसखोर जवानांना ठार केले, तर ५0 घुसखोरांचे प्रयत्न जवानांमुळे असफल ठरले आणि ते पळून गेले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत दिली. गेल्या वर्षी घुसखोरीचे ४0६ प्रयत्न झाले होते आणि १२३ दहशतवादी भारतात घुसले होते, असे सांगून ते म्हणाले की, या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या ९0 चकमकींमध्ये ११३ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, त्यात सुरक्षा दलांचे ३९ जवानही शहीद झाले. यंदा काश्मिरात आतापर्यंत हिंसाचाराच्या ३0८ घटना घडल्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर