शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:33 IST

पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला.

श्रीनगर : पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले असले, तरी मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.भारतात घातपात घडवून आणण्यासाठी ८ दहशतवादी काश्मीरमार्गे घुसणार असल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलांचे जवान सतर्क झाले होते. हे अतिरेकी घुसण्याच्या प्रयत्नात असताना, त्यात अडथळे येऊ नयेत, म्हणून पाकिस्तानी लष्कराने भारतीय सीमेवर निष्कारण गोळीबार सुरू केला. त्या वेळी मेजर राणे व अन्य जवानांनी या अतिरेक्यांना घुसता येऊ नये, म्हणून जिवाची बाजी लावली. त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला तोंड देतानाच दहशतवाद्यांना अडवण्याचेही प्रयत्न सुरू केले. या अतिरेक्यांनीही जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला त्याच पद्धतीने मेजर राणे व त्यांच्या सहकाºयांनी प्रत्युत्तर दिले. त्यात चार अतिरेकी ठार झाले, तर उरलेले चौघे जण बहुधा पळून गेले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून, कारवाईनंतर गुरेज सेक्टरमधील सर्वच नियंत्रण रेषांपाशी व परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यापैकी दोन अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. >घुसखोरी रोखताना जिवाची बाजीकौस्तुभ हे मीरा रोडचे (ठाणे) राहणारे. त्यांचे काका प्रताप राणे यांनी सांगितले की, एप्रिलमध्येच कौस्तुभ भेटून गेला होता. सीमेवर उंचावर असल्याने संपर्कव्हायचा नाही, पण कॅम्पमध्ये आला की, रात्री २-३ वाजता तो फोन करून मी ठीक आहे, असे कळवायचा. तेवढेच त्याच्याशी घरच्यांचे बोलणे व्हायचे. गस्तीवरून यायला उशीर झाला की, जेवण संपलेले असायचे. २५ जुलैला त्याच्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.>सहा महिन्यांत १३३ प्रयत्न; ६९ अतिरेकी घुसलेनवी दिल्ली : या वर्षी जानेवारी ते जून या काळात पाकिस्तानातून ६९ अतिरेकी भारतात घुसले. वर्षभरात घुसखोरीचे एकूण १३३ प्रयत्न झाले. जवानांनी १४ घुसखोर जवानांना ठार केले, तर ५0 घुसखोरांचे प्रयत्न जवानांमुळे असफल ठरले आणि ते पळून गेले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत दिली. गेल्या वर्षी घुसखोरीचे ४0६ प्रयत्न झाले होते आणि १२३ दहशतवादी भारतात घुसले होते, असे सांगून ते म्हणाले की, या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या ९0 चकमकींमध्ये ११३ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, त्यात सुरक्षा दलांचे ३९ जवानही शहीद झाले. यंदा काश्मिरात आतापर्यंत हिंसाचाराच्या ३0८ घटना घडल्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर