शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:33 IST

पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला.

श्रीनगर : पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले असले, तरी मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.भारतात घातपात घडवून आणण्यासाठी ८ दहशतवादी काश्मीरमार्गे घुसणार असल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलांचे जवान सतर्क झाले होते. हे अतिरेकी घुसण्याच्या प्रयत्नात असताना, त्यात अडथळे येऊ नयेत, म्हणून पाकिस्तानी लष्कराने भारतीय सीमेवर निष्कारण गोळीबार सुरू केला. त्या वेळी मेजर राणे व अन्य जवानांनी या अतिरेक्यांना घुसता येऊ नये, म्हणून जिवाची बाजी लावली. त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला तोंड देतानाच दहशतवाद्यांना अडवण्याचेही प्रयत्न सुरू केले. या अतिरेक्यांनीही जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला त्याच पद्धतीने मेजर राणे व त्यांच्या सहकाºयांनी प्रत्युत्तर दिले. त्यात चार अतिरेकी ठार झाले, तर उरलेले चौघे जण बहुधा पळून गेले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून, कारवाईनंतर गुरेज सेक्टरमधील सर्वच नियंत्रण रेषांपाशी व परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यापैकी दोन अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. >घुसखोरी रोखताना जिवाची बाजीकौस्तुभ हे मीरा रोडचे (ठाणे) राहणारे. त्यांचे काका प्रताप राणे यांनी सांगितले की, एप्रिलमध्येच कौस्तुभ भेटून गेला होता. सीमेवर उंचावर असल्याने संपर्कव्हायचा नाही, पण कॅम्पमध्ये आला की, रात्री २-३ वाजता तो फोन करून मी ठीक आहे, असे कळवायचा. तेवढेच त्याच्याशी घरच्यांचे बोलणे व्हायचे. गस्तीवरून यायला उशीर झाला की, जेवण संपलेले असायचे. २५ जुलैला त्याच्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.>सहा महिन्यांत १३३ प्रयत्न; ६९ अतिरेकी घुसलेनवी दिल्ली : या वर्षी जानेवारी ते जून या काळात पाकिस्तानातून ६९ अतिरेकी भारतात घुसले. वर्षभरात घुसखोरीचे एकूण १३३ प्रयत्न झाले. जवानांनी १४ घुसखोर जवानांना ठार केले, तर ५0 घुसखोरांचे प्रयत्न जवानांमुळे असफल ठरले आणि ते पळून गेले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत दिली. गेल्या वर्षी घुसखोरीचे ४0६ प्रयत्न झाले होते आणि १२३ दहशतवादी भारतात घुसले होते, असे सांगून ते म्हणाले की, या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या ९0 चकमकींमध्ये ११३ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, त्यात सुरक्षा दलांचे ३९ जवानही शहीद झाले. यंदा काश्मिरात आतापर्यंत हिंसाचाराच्या ३0८ घटना घडल्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर