शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोकणचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:33 IST

पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला.

श्रीनगर : पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा ८ दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. जवानांच्या या धाडसी कारवाईत मंगळवारी पहाटे चार अतिरेकी ठार झाले असले, तरी मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्यही ही कारवाई मध्यरात्री सुरू झाली होती.कौस्तुभ राणे हे मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडचे रहिवासी होते. त्यांच्याखेरीज हवालदार जमी सिंग, हवालदार विक्रमजीत व रायफलमॅन मनदीप हेही या कारवाईमध्ये हुतात्मा झाले आहेत. कौस्तुभ राणेंबरोबरच हे तिघेही लष्कराच्या ३६ राष्ट्रीय रायफल्सचा भाग होते.भारतात घातपात घडवून आणण्यासाठी ८ दहशतवादी काश्मीरमार्गे घुसणार असल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलांचे जवान सतर्क झाले होते. हे अतिरेकी घुसण्याच्या प्रयत्नात असताना, त्यात अडथळे येऊ नयेत, म्हणून पाकिस्तानी लष्कराने भारतीय सीमेवर निष्कारण गोळीबार सुरू केला. त्या वेळी मेजर राणे व अन्य जवानांनी या अतिरेक्यांना घुसता येऊ नये, म्हणून जिवाची बाजी लावली. त्यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला तोंड देतानाच दहशतवाद्यांना अडवण्याचेही प्रयत्न सुरू केले. या अतिरेक्यांनीही जवानांवर गोळीबार सुरू केला. त्याला त्याच पद्धतीने मेजर राणे व त्यांच्या सहकाºयांनी प्रत्युत्तर दिले. त्यात चार अतिरेकी ठार झाले, तर उरलेले चौघे जण बहुधा पळून गेले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात असून, कारवाईनंतर गुरेज सेक्टरमधील सर्वच नियंत्रण रेषांपाशी व परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यापैकी दोन अतिरेक्यांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य दोन मृतदेहांचा शोध घेतला जात आहे. >घुसखोरी रोखताना जिवाची बाजीकौस्तुभ हे मीरा रोडचे (ठाणे) राहणारे. त्यांचे काका प्रताप राणे यांनी सांगितले की, एप्रिलमध्येच कौस्तुभ भेटून गेला होता. सीमेवर उंचावर असल्याने संपर्कव्हायचा नाही, पण कॅम्पमध्ये आला की, रात्री २-३ वाजता तो फोन करून मी ठीक आहे, असे कळवायचा. तेवढेच त्याच्याशी घरच्यांचे बोलणे व्हायचे. गस्तीवरून यायला उशीर झाला की, जेवण संपलेले असायचे. २५ जुलैला त्याच्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.>सहा महिन्यांत १३३ प्रयत्न; ६९ अतिरेकी घुसलेनवी दिल्ली : या वर्षी जानेवारी ते जून या काळात पाकिस्तानातून ६९ अतिरेकी भारतात घुसले. वर्षभरात घुसखोरीचे एकूण १३३ प्रयत्न झाले. जवानांनी १४ घुसखोर जवानांना ठार केले, तर ५0 घुसखोरांचे प्रयत्न जवानांमुळे असफल ठरले आणि ते पळून गेले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज लोकसभेत दिली. गेल्या वर्षी घुसखोरीचे ४0६ प्रयत्न झाले होते आणि १२३ दहशतवादी भारतात घुसले होते, असे सांगून ते म्हणाले की, या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या ९0 चकमकींमध्ये ११३ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, त्यात सुरक्षा दलांचे ३९ जवानही शहीद झाले. यंदा काश्मिरात आतापर्यंत हिंसाचाराच्या ३0८ घटना घडल्या.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर