शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

सॅल्यूट! दोन IIM मध्ये मिळत होती अ‍ॅडमिशन; पण शहीद वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यानं निवडलं देशसेवेचं 'मिशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:25 IST

देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

कारगिल युद्धात देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय. प्रज्वल समृत (Prajwal Samrit)असं त्याचं आहे. प्रज्वलच्या जन्माच्या अवघ्या ४५ दिवस आधी, त्यांचे वडील लान्स नाईक कृष्णाजी समृत १९९९ मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले. यावेळी त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा होता. त्यानं लष्करात अधिकारी म्हणून जावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु आता आपल्या वडिलांची ही इच्छा त्यांचा छोटा मुलगा पूर्ण करणार आहे.

प्रज्वल जूनच्या पहिल्या आठवड्यात डेहराडूनमधील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये (IMA) कॅडेट म्हणून रुजू होणार असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय. त्याचा मोठा भाऊ कुणाल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर, प्रज्वलनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नऊ वेळा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) मुलाखतीला सामोरे गेलेल्या प्रज्वलसाठी हे बिलकुल सोपं नव्हतं.

बारावीनंतर ड्रॉप घेतला

“आम्हाला योग्य तारीख माहित नाही. पण आम्ही ३० जुलैला त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. २०१८ मध्ये मी एनडीएच्या प्रवेशासाठी बारावीनंतर ड्रॉप घेतला होता आणि पहिली एसएसबी उत्तीर्ण केली होती. परंतु मेडिकल परीक्षेत अपयश आलं. त्यानंतर पुण्याला जाऊन बीएससीसाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मी एसएसबीच्या सात आणखी मुलाखती दिल्या. प्रत्येक वेळी स्क्रिनिंगमधून पुझे गेलो आणि कॉन्फ्रेंटमघ्ये बाहेर गेलो,” असं प्रज्वलनं सांगितलं.

आठव्यांदाही आपण अपयशी ठरलो आणि जवळपास पराभवच स्वीकारला. परंतु आपला शेजारी नितीन यानं अखेरच्या संधीपर्यंत प्रयत्न करण्यास सांगितलं. प्रज्वलनं आठव्यांदा अपयश आल्यानंतर जवळपास पराभव स्वीकारला होता. परंतु मी त्याला विश्वास ठेवण्यास सांगितलं. त्यानं आपल्या जीवनातील सर्वच परीक्षांमध्ये टॉप केलं. त्यानं सर्वकाही आपल्याच हिंमतीवर मिळवल्याचं नितीन यांनी सांगितलं.

अखेरची संधी

“ही माझ्यासाठी अखेरची संधी असल्यामुळे मला एक मजबूत बॅकअप प्लॅन तयार करावा लागला. मी कॉमन ॲडमिशन टेस्ट क्रॅक केली आणि या महिन्यात आयआयएम इंदूर आणि कोझिकोडमधून ऑफर मिळाली,” असं प्रज्वलनं आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं. “जरी कारगिल युद्धात आपल्याला आपल्या पतीला गमवावं लागलं असलं तरी आपला एक मुलगा त्यांचं स्वप्न पूर्ण करेल असा निश्चय केला होता,” असं प्रज्वलची आई सविता यांनी म्हटलं.

अभिमान वाटतो

“माझ्या मोठ्या मुलानं लष्करातील अधिकारी व्हावं असं माझ्या पतीची इच्छा होती. परंतु मोठा मुलगा कुणालला ते शक्य झालं नाही. परंतु प्रज्वल हे करू शकतो अशी आम्हाला अपेक्षा होती. आज आम्हाला अतिशय अभिमान वाटतो,” असं त्या म्हणाल्या. प्रज्वलची आई सविता या पुलगांवमधी आर्मी हॉस्पीटलमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. १९९१ मध्ये कृष्णाजी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. कारगिलमध्ये जाण्यापूर्वी हे दांपत्य त्रिवेंद्रम, बेळगाव आणि कोलकात्यात वास्तव्यास होतं. परंतु आता त्या पुलगाममध्येच वास्तव्यास आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत