शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट! दोन IIM मध्ये मिळत होती अ‍ॅडमिशन; पण शहीद वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यानं निवडलं देशसेवेचं 'मिशन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 13:25 IST

देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

कारगिल युद्धात देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलानं आयआयएम सोडून लष्करात जाण्याचा मोठा निर्णय घेतलाय. प्रज्वल समृत (Prajwal Samrit)असं त्याचं आहे. प्रज्वलच्या जन्माच्या अवघ्या ४५ दिवस आधी, त्यांचे वडील लान्स नाईक कृष्णाजी समृत १९९९ मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले. यावेळी त्यांचा मोठा मुलगा अडीच वर्षांचा होता. त्यानं लष्करात अधिकारी म्हणून जावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु आता आपल्या वडिलांची ही इच्छा त्यांचा छोटा मुलगा पूर्ण करणार आहे.

प्रज्वल जूनच्या पहिल्या आठवड्यात डेहराडूनमधील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये (IMA) कॅडेट म्हणून रुजू होणार असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय. त्याचा मोठा भाऊ कुणाल इंजिनिअरिंगला गेल्यानंतर, प्रज्वलनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी नऊ वेळा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) मुलाखतीला सामोरे गेलेल्या प्रज्वलसाठी हे बिलकुल सोपं नव्हतं.

बारावीनंतर ड्रॉप घेतला

“आम्हाला योग्य तारीख माहित नाही. पण आम्ही ३० जुलैला त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. २०१८ मध्ये मी एनडीएच्या प्रवेशासाठी बारावीनंतर ड्रॉप घेतला होता आणि पहिली एसएसबी उत्तीर्ण केली होती. परंतु मेडिकल परीक्षेत अपयश आलं. त्यानंतर पुण्याला जाऊन बीएससीसाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. मी एसएसबीच्या सात आणखी मुलाखती दिल्या. प्रत्येक वेळी स्क्रिनिंगमधून पुझे गेलो आणि कॉन्फ्रेंटमघ्ये बाहेर गेलो,” असं प्रज्वलनं सांगितलं.

आठव्यांदाही आपण अपयशी ठरलो आणि जवळपास पराभवच स्वीकारला. परंतु आपला शेजारी नितीन यानं अखेरच्या संधीपर्यंत प्रयत्न करण्यास सांगितलं. प्रज्वलनं आठव्यांदा अपयश आल्यानंतर जवळपास पराभव स्वीकारला होता. परंतु मी त्याला विश्वास ठेवण्यास सांगितलं. त्यानं आपल्या जीवनातील सर्वच परीक्षांमध्ये टॉप केलं. त्यानं सर्वकाही आपल्याच हिंमतीवर मिळवल्याचं नितीन यांनी सांगितलं.

अखेरची संधी

“ही माझ्यासाठी अखेरची संधी असल्यामुळे मला एक मजबूत बॅकअप प्लॅन तयार करावा लागला. मी कॉमन ॲडमिशन टेस्ट क्रॅक केली आणि या महिन्यात आयआयएम इंदूर आणि कोझिकोडमधून ऑफर मिळाली,” असं प्रज्वलनं आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं. “जरी कारगिल युद्धात आपल्याला आपल्या पतीला गमवावं लागलं असलं तरी आपला एक मुलगा त्यांचं स्वप्न पूर्ण करेल असा निश्चय केला होता,” असं प्रज्वलची आई सविता यांनी म्हटलं.

अभिमान वाटतो

“माझ्या मोठ्या मुलानं लष्करातील अधिकारी व्हावं असं माझ्या पतीची इच्छा होती. परंतु मोठा मुलगा कुणालला ते शक्य झालं नाही. परंतु प्रज्वल हे करू शकतो अशी आम्हाला अपेक्षा होती. आज आम्हाला अतिशय अभिमान वाटतो,” असं त्या म्हणाल्या. प्रज्वलची आई सविता या पुलगांवमधी आर्मी हॉस्पीटलमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. १९९१ मध्ये कृष्णाजी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. कारगिलमध्ये जाण्यापूर्वी हे दांपत्य त्रिवेंद्रम, बेळगाव आणि कोलकात्यात वास्तव्यास होतं. परंतु आता त्या पुलगाममध्येच वास्तव्यास आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारत