शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:22 IST

Uttar Pradesh Crime News: दोन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमधून २०-२५ माणसं भरून आणून एका जावयाने सासरवाडीमध्ये तुफान राडा केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. लग्नानंतर महिनाभरातच या जावयाने त्याचं सासर असलेल्या रसौली गावात माणसं आणून सासरच्या मंडळींवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

दोन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमधून २०-२५ माणसं भरून आणून एका जावयाने सासरवाडीमध्ये तुफान राडा केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. लग्नानंतर महिनाभरातच या जावयाने त्याचं सासर असलेल्या रसौली गावात माणसं आणून सासरच्या मंडळींवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत सुमारे १० जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जावयाने सासरच्या मंडळींवर केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये गावात आलेली रुग्णवाहिका आणि दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये होत असलेली हाणामारी दिसत आहे.

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गावात घुसलेल्या रुग्णवाहिका आणि व्हॅन पाहून लोकांना सुरुवातीला काही समजले नाही. त्यानंतर या वाहनांमधून उतरलेल्या तरुणांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी चेन आणि धारदार हत्यारांद्वारे सासरच्या मंडळींवर हल्ला चढवला. यात दोन्ही बाजूचे मिळून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेत जखमी झालेल्या नईमा बानो यांनी सांगितले की,  माझी मुलगी झोया हिचं लग्न २० जून रोजी लखनौमधील मोहम्मद दानिश याच्यासोबत लावून दिलं होतं. तर या घटनेत जखमी झालेल्या झुबेर याने सांगितले की, दानिश हा तीन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमध्ये २० ते २५ जणांना भरून घेऊन आला. या सर्वांकडे लाठ्याकाठ्या, धारदार हत्यारे होती. इथे येताच त्याने कोण अडवतो ते पाहू असं आव्हान दिलं आणि मारहाण सुरू केली. यादरम्यान, मध्ये पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांनाही बेदम मारहाण केली गेली. मोहम्मद दानिश हा गावच्या गल्लीबोळातून सुसाट गाडी चालवायचा. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्याच्याबाबत रोष होता. मात्र त्याला अडवले तर मला कोण अडवतो ते बघतो, अशी धमकी द्यायचा.

दरम्यान, या हाणामारीत दानिश हासुद्धा जखमी झाला असून, त्याने ग्रामस्थांवर उलट आरोप केला आहे. गावातील काही तरुण माझी मेहुणी आमि इतर बहिणींची छेड काढायचे. मी मित्रांसोबत त्यांना समजावण्यासाठी आलो असता, त्यांनी माझ्यावरच हल्ला केला. असा आरोप त्याने केला.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश