शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

काेणी अचानक किंचाळतो, कोणी हसतो! रेल्वे अपघातातग्रस्तांना बसला जबर धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 14:32 IST

ओडिशा रेल्वे अपघातातील ४० जखमींना बसला जबर धक्का

बालासोर: ओडिशातील तिहेरी रेल्वेअपघातातील जखमी प्रवाशांपैकी काहींना मोठा धक्का बसला आहे. यातील कोणी झोपेतून दचकून उठतो. कोणी उगीचच किंचाळू लागतो. काही हसू लागतात, तर काही हमसून हमसून रडतात. काहींची तर झोपच गायब आहे.

या प्रवाशांना कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे हे दृश्य आता नित्याचे झाले आहे. हे लोक ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरने’ (पीटीएसडी) पीडित आहेत. मोठा धक्का बसल्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

समुपदेशनासाठी ४ पथके

अशा जखमींचे समुपदेशन करण्यासाठी चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ याशिवाय एक सामाजिक कार्यकर्ता आणि जखमींच्या एक किंवा दोन नातेवाइकांचा समावेश असतो. हे पथक जखमींच्या मनातील दहशत दूर करण्याचा प्रयत्न करते.

फेरफारवर तपास केंद्रित

सीबीआयने स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीत करण्यात आलेल्या फेरफारवर तपास केंद्रित केला आहे. ही यंत्रणा कोणत्याही रेल्वेचा मार्ग ठरवते. कोरोमंडल एक्स्प्रेस मॅन्युअली सिग्नलला बायपास करून लूप लाइनवर पाठविल्याचा संशय आहे.

क्लिनिकल सायकॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. यशवंत महापात्रा यांनी सांगितले की, जखमी प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. ते घाबरले आहेत. अपघातांतून वाचलेल्यांच्या मनावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्यांना त्यांच्या नैसर्गिक स्थितीत परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघात