शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:02 IST

'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते...'

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी केली. यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून फटकारले. 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते.'

सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना इशारा -राहुल गांधींना इशारा देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास समजून घेतल्याशिवाय आपण अशा प्रकारची विधाने करू शकत नाही. राहुल गांधींनी भविष्यात अशा प्रकारचे विधान केले तर, आम्ही स्वतःहून त्याची दखल घेऊ आणि सुनावणी करू. आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आपण असे कसे वागू शकता? यावेळी सावरकर आहेत, पुढच्या वेळी कुणी म्हणेल की, महात्मा गांधी इंग्रजांचे नोकर होते.' याच वेळी, भविष्यात अशी विधाने करू नका, असा इशाराही न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिला.

खंड पीठानं राहुल गांधींच्या वकिलाला विचारले असा प्रश्न -न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने, राहुल गांधी यांना भविष्यात अशा प्रकारची विधाने करू नयेत, असा इशारा दिला आहे. यावेळी न्यायालयाने राहुल गांधींचे वकील अभिषेक सिंघवी यांना, 'महात्मा गांधीही ब्रिटिशांशी संवाद साधताना, पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" सारखे शब्द वापरायचे, हे राहुल गांधींना माहित आहे का?' असा सवालही केला.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधातील राहुल गांधी यांच्या याचिकेवर तक्रारकर्ता आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटिस जारी केली आहे. तत्पूर्वी, विनायक दामोदर सावरकर यांच्याविरुद्ध टिप्पणी केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेले समन्स रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. यामुळे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.राहुल गांधींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १५३ अ (शत्रूत्वाला प्रोत्साहन देणे) आणि कलम ५०५ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या विरुद्ध हा खटला वकील नृपेंद्र पांडे यांनी दाखल केला होता, ज्यांनी राहुल गांधींवर महाराष्ट्रातील अकोला येथील एका रॅलीदरम्यान जाणूनबुजून सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर