शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

'असं तर कुणी महात्मा गांधींनाही इंग्रजांचं नोकर म्हणेन...', सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 18:02 IST

'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते...'

स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी केली. यावेळी, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून फटकारले. 'राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. खुद्द महात्मा गांधी यांनीही सावरकरांचा सन्मान केला आहे. एवढेच नाही तर, त्यांची आजी इंदिरा गांधी यांनीही त्यांना पत्र लिहिले होते.'

सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना इशारा -राहुल गांधींना इशारा देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास समजून घेतल्याशिवाय आपण अशा प्रकारची विधाने करू शकत नाही. राहुल गांधींनी भविष्यात अशा प्रकारचे विधान केले तर, आम्ही स्वतःहून त्याची दखल घेऊ आणि सुनावणी करू. आपल्याला स्वातंत्र्य देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आपण असे कसे वागू शकता? यावेळी सावरकर आहेत, पुढच्या वेळी कुणी म्हणेल की, महात्मा गांधी इंग्रजांचे नोकर होते.' याच वेळी, भविष्यात अशी विधाने करू नका, असा इशाराही न्यायालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिला.

खंड पीठानं राहुल गांधींच्या वकिलाला विचारले असा प्रश्न -न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने, राहुल गांधी यांना भविष्यात अशा प्रकारची विधाने करू नयेत, असा इशारा दिला आहे. यावेळी न्यायालयाने राहुल गांधींचे वकील अभिषेक सिंघवी यांना, 'महात्मा गांधीही ब्रिटिशांशी संवाद साधताना "आपला विश्वासू सेवक" सारखे शब्द वापरायचे, हे राहुल गांधींना माहित आहे का?' असा सवालही केला.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधातील राहुल गांधी यांच्या याचिकेवर तक्रारकर्ता आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटिस जारी केली आहे. तत्पूर्वी, विनायक दामोदर सावरकर यांच्याविरुद्ध टिप्पणी केल्याबद्दल दंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेले समन्स रद्द करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला होता. यामुळे राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.राहुल गांधींवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १५३ अ (शत्रूत्वाला प्रोत्साहन देणे) आणि कलम ५०५ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या विरुद्ध हा खटला वकील नृपेंद्र पांडे यांनी दाखल केला होता, ज्यांनी राहुल गांधींवर महाराष्ट्रातील अकोला येथील एका रॅलीदरम्यान जाणूनबुजून सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर