शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 18:45 IST

भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ज्या लोकांनी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अशा लोकांवर मोदी यांनी जोरदार टीका केली. भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकीकडे आपल्या जवानांच्या धाडसाचे देशवासियांना अभिमान वाटत आहे, तर दुसरीकडे अशी माणसे एअर स्टाइकवर शंका घेऊन पाकिस्तानाला तसेच दहशतवाद्यांना फायदा होईल अशी वक्तव्ये करत आहेत. पाकिस्तानच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे असल्याने सध्या पाकिस्तान दबावाखाली आहे. त्यावेळी या माणसांच्या वक्तव्यावरून जगभरातील देशाची वाईट प्रतिमा निर्माण होत आहे. देशाची सव्वाशे करोड जनता एकत्र येऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला जावा अशी इच्छा ठेवते. याच इच्छेच्या जोरावर मी दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

 

काश्मिरींना  मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा 

कानपूर येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊ येथील काश्मिरींना मारहाण घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. सध्या देशाचा ऐक्य राखणं महत्त्वाचे आहे. मात्र काही माथेफिरू लोक काश्मिरींना मारहाण करत आहेत. ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या प्रत्येक ठिकाणी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना दिल्या. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान