शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 18:45 IST

भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ज्या लोकांनी पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अशा लोकांवर मोदी यांनी जोरदार टीका केली. भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकीकडे आपल्या जवानांच्या धाडसाचे देशवासियांना अभिमान वाटत आहे, तर दुसरीकडे अशी माणसे एअर स्टाइकवर शंका घेऊन पाकिस्तानाला तसेच दहशतवाद्यांना फायदा होईल अशी वक्तव्ये करत आहेत. पाकिस्तानच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे असल्याने सध्या पाकिस्तान दबावाखाली आहे. त्यावेळी या माणसांच्या वक्तव्यावरून जगभरातील देशाची वाईट प्रतिमा निर्माण होत आहे. देशाची सव्वाशे करोड जनता एकत्र येऊन दहशतवाद्यांचा खात्मा केला जावा अशी इच्छा ठेवते. याच इच्छेच्या जोरावर मी दहशतवाद्यांच्या विरोधात ठोस कारवाई करत आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

 

काश्मिरींना  मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा 

कानपूर येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनऊ येथील काश्मिरींना मारहाण घडलेल्या घटनेचा उल्लेख केला. सध्या देशाचा ऐक्य राखणं महत्त्वाचे आहे. मात्र काही माथेफिरू लोक काश्मिरींना मारहाण करत आहेत. ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या प्रत्येक ठिकाणी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना दिल्या. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान