शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

...तर जवानांना स्वखर्चाने खरेदी करावा लागेल गणवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 14:40 IST

केंद्र सरकारने दारुगोळा खरेदीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध न केल्याने लष्कराला हे पाऊल उचलावे लागले आहे.

नवी दिल्ली -  भारतीय लष्कराने सरकारी शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांमधून (ऑर्डनन्स  फॅक्टरी) होणाऱ्या आपल्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये आवश्यक दारुगोळा तातडीने खरेदी करण्यासाठी पैसे साठवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.  एका अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे लष्कर ऑर्डनन्स  फॅक्टरीमधून पुरवठा होणाऱ्या उत्पादनांचे प्रमाण 94 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यत कमी करणार आहे. केंद्र सरकारने दारुगोळा खरेदीसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध न केल्याने लष्कराला हे पाऊल उचलावे लागले आहे. दरम्यान, लष्कराच्या या निर्णयामुळे जवानांना मिळणाऱ्या गणवेशाच्या साहित्याचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सैनिकांना आपला गणवेश आणि अन्य साहित्य खुल्या बाजारातून खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच काही वाहनांच्या सुट्या भागांची खरेदी करणेही या निर्णयामुळे कठीण होणार आहे. लष्कर आपातकालीन दारुगोळ्याचा साठा करण्यासाठी तीन योजनांवर काम करत आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने अतिरिक्त निधी न दिल्याने लष्करावर ही वेळ आली आहे. अशा परिस्थितीत लष्कराकडून आपल्या किमान खर्चामध्येच आपातकालीन दारुगोळा खरेदीची व्यवस्था करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. 2018-19 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कराकडे ऑर्डनन्स फॅक्टरीमधून होणाऱ्या पुरवठ्यामध्ये कपात करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. दरम्यान लष्कर ज्या तीन प्रकल्पांवर काम करत आहे. त्यापैकी केवळ एकच सुरू झाला आहे.  गेल्या काही वर्षात निधीच्या कमतरतेमुळे लष्कराच्या आपातकालीन प्रकल्पांना फटका बसला आहे.    

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतGovernmentसरकार