शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

अतिरेक्यांसाठी सोशल मीडिया ‘टूल’; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सीटीसी बैठकीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 11:25 IST

दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे.

नवी दिल्ली : समाजमाध्यमांचे प्लॅटफॉर्म्स दहशतवादी गटांसाठी सक्षम ‘टुल किट’ साधने बनत आहेत, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘दहशतवादविरोधी समिती’च्या (सीटीसी) विशेष बैठकीत ते बोलत होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अशा बैठकीचे आयोजन भारतात प्रथमच करण्यात आले आहे.  

जयशंकर यांनी सांगितले की, दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे. या शक्ती नवे तंत्रज्ञान आणि क्रिप्टो चलनाचा वापर करीत आहेत. समाजांना अस्थिर करण्यासाठी तसेच कट्टरता पसरविण्यासाठी ते खोटा प्रचार आणि कटकारस्थानांचा आधार घेत आहेत. ड्रोनसारख्या अत्याधुनिक मनुष्यविरहित हवाई यंत्रणांचा वापरही ते करीत असून ही अधिक चिंतेची बाब आहे.

पाकिस्तानचे थेट नाव न घेता जयशंकर यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मागील २ दशकांत महत्त्वपूर्ण यंत्रणा उभी केली. दहशतवादविरोधी निर्बंधांच्या पायावर उभी असलेली ही यंत्रणा दहशतवादाला राज्याचे धारेण म्हणून राबविणाऱ्या देशांना इशारा देण्यास सक्षम आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तथा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला अजूनही शिक्षा झालेली नाही, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

२६/११ हल्ला खटल्यासाठी हवा मजबूत पुरावा : पाकचा पुन्हा कांगावा

एस. जयशंकर यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत हा पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करीत आहे. मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी मजबूत पुरावा हवा.

कृती आवश्यक - 

अँटोनिओ ग्युटेरस लोकांना कट्टरपंथी बनविण्यासाठी तसेच समाजात अशांतता पसरविण्यासाठी विविध दहशतवादी गटांकडून होणारा तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व जगाने एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरस यांनी केले. बैठकीला उद्देशून पाठविलेल्या भाषणात ग्युटेरस म्हणाले की, काही घातक शक्ती, दहशतवादी गट नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत आहेत. त्याविरुद्ध संपूर्ण जगाने सामूहिकरीत्या उभे राहण्याची गरज आहे.

टॅग्स :Indiaभारतterroristदहशतवादी