शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेक्यांसाठी सोशल मीडिया ‘टूल’; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सीटीसी बैठकीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 11:25 IST

दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे.

नवी दिल्ली : समाजमाध्यमांचे प्लॅटफॉर्म्स दहशतवादी गटांसाठी सक्षम ‘टुल किट’ साधने बनत आहेत, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘दहशतवादविरोधी समिती’च्या (सीटीसी) विशेष बैठकीत ते बोलत होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अशा बैठकीचे आयोजन भारतात प्रथमच करण्यात आले आहे.  

जयशंकर यांनी सांगितले की, दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे. या शक्ती नवे तंत्रज्ञान आणि क्रिप्टो चलनाचा वापर करीत आहेत. समाजांना अस्थिर करण्यासाठी तसेच कट्टरता पसरविण्यासाठी ते खोटा प्रचार आणि कटकारस्थानांचा आधार घेत आहेत. ड्रोनसारख्या अत्याधुनिक मनुष्यविरहित हवाई यंत्रणांचा वापरही ते करीत असून ही अधिक चिंतेची बाब आहे.

पाकिस्तानचे थेट नाव न घेता जयशंकर यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मागील २ दशकांत महत्त्वपूर्ण यंत्रणा उभी केली. दहशतवादविरोधी निर्बंधांच्या पायावर उभी असलेली ही यंत्रणा दहशतवादाला राज्याचे धारेण म्हणून राबविणाऱ्या देशांना इशारा देण्यास सक्षम आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तथा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला अजूनही शिक्षा झालेली नाही, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

२६/११ हल्ला खटल्यासाठी हवा मजबूत पुरावा : पाकचा पुन्हा कांगावा

एस. जयशंकर यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत हा पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करीत आहे. मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी मजबूत पुरावा हवा.

कृती आवश्यक - 

अँटोनिओ ग्युटेरस लोकांना कट्टरपंथी बनविण्यासाठी तसेच समाजात अशांतता पसरविण्यासाठी विविध दहशतवादी गटांकडून होणारा तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व जगाने एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरस यांनी केले. बैठकीला उद्देशून पाठविलेल्या भाषणात ग्युटेरस म्हणाले की, काही घातक शक्ती, दहशतवादी गट नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत आहेत. त्याविरुद्ध संपूर्ण जगाने सामूहिकरीत्या उभे राहण्याची गरज आहे.

टॅग्स :Indiaभारतterroristदहशतवादी