शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे भाजपा बचावात्मक पवित्र्यात, टीकेमुळे सत्ताधा-यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:27 IST

ज्या सोशल मीडियावर तीन वर्षे अधिराज्य गाजवले, तेच व्यासपीठ आता भाजापासाठी चिंतेचा विषय बनले आहे. त्या माध्यमावरून भाजपावर टीकास्त्र सुरू झाल्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्याची पाळी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आली.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : ज्या सोशल मीडियावर तीन वर्षे अधिराज्य गाजवले, तेच व्यासपीठ आता भाजापासाठी चिंतेचा विषय बनले आहे. त्या माध्यमावरून भाजपावर टीकास्त्र सुरू झाल्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेवू नका, असे सांगण्याची पाळी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आली.पेट्रोल डिझेलच्या किमती अलीकडेच वाढल्या, तेव्हा मोदी, सुषमा स्वराज, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी आदी नेत्यांचे भाववाढीच्या विरोधातले जुने ट्विट्स व धरणे निदर्शनांची छायाचित्रे, त्यांच्या सध्याच्या निवेदनापेक्षाही अधिक शेअर केले गेले आणि रीट्विट होत आहेत. गुजरात विधानसभेच्या प्रचारात तर काँग्रेसने भाजपाच्याच जुन्या पोस्टर्सचा आधार घेत आपले प्रचार अभियान आखले आहे. याच मालिकेतले ‘विकास पागल हो गया है’ हे अभियान गुजरातामधे सध्या विशेष चर्चेत आहे. सत्ताधारी पक्षाला नेहमीच इतर पक्षांपेक्षा अधिक टीका सहन करावी लागते. भाजप त्यामुळेच सध्या अधिक चिंतेत आहे.आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय टोलेबाजीखेरीज, देशाच्या सुरक्षेसाठीही समाज माध्यमे सरकारच्या चिंतेचा विषय बनला आहे. गृहमंत्री राजनाथसिंगांनी सोशल मीडियावर राष्ट्रविरोधी कंटेटचे प्रमाण खूपच वाढले आहे, असे मत अलीकडेच व्यक्त केले.फेसबुक व व्टीटरवरील किमान ४00 कंटेट व १00 अकाउंट्स सरकारने बंद करण्यास भाग पाडले. काश्मीरमधे दहशतवादी गटांचे नेटवर्कच व्हॉटस अ‍ॅपवर चालते. सोशल मीडियावरील अफवांमुळे निर्माण होतो व तमाम दंगली त्यामुळेच भडकतात, असा सरकारी सूत्रांचा दावा आहे.>खरे तर नरेंद्र मोदींना २0१४ साली ऐतिहासिक विजय संपादनकरून देण्यात सोशल मीडियाच्या व्यासपीठाचाच सर्वात मोठा सहभाग होता. तेच माध्यम सध्या अनेक शंका व वादांचे केंद्र बनले आहे. या माध्यमाची विश्वासार्हता त्यामुळेच पणाला लागली आहे.>जुना खेळ आला अंगाशीसोशल मीडियावर २0१४ पर्यंत भाजपाचा बराच दबदबा होता. दिल्लीत केजरीवाल यांच्या ‘आप’ चा दरम्यान त्यात शिरकाव झाला. कालांतराने काँग्रेससह साºयाच प्रादेशिक पक्षांनी संघटितपणे या माध्यमाचा वापर सुरू केला. त्यामुळे भाजपापुढे मोठेच आव्हान उभे राहिले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया