शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

... तर देशात यापुढे लॉकडाऊन वाढविण्यात अर्थच काय?, ममतांचा मोदींना सवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 20:35 IST

लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, कोरानापासून गावांना लांब ठेवण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊननंतर काय यावर चर्चा करताना राज्यांनी कोणती काळजी घ्यावी यावरही सूचना केल्या. हळू हळू परंतू प्रत्यक्षात विविध भागात आर्थिक व्यवहार सुरु झाले आहेत. भविष्यात यामध्ये वेग येईल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली. यावेळी, मोदींना काही मुख्यमंत्र्यांनी सूचनाही मांडल्या आहेत. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊनवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.  

लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, कोरानापासून गावांना लांब ठेवण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले. तसेच सहा फूट अंतर ठेवणे कमी झाले तर फार मोठे संकट उभे राहिल अशी भीतीही मोदींनी व्यक्त केली. आपल्याला आता हे समजून घ्यावे लागेल की, कोरोनासोबतची लढाई आता जास्त स्पष्ट असेल. पुढे आपल्याला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे, असेही मोदी म्हणाले. कोरोनाविरोधात लढण्यात भारताला यश मिळाले आहे. जगभरातून याची दखल घेतली गेली आहे. हे यश राज्यांचेही असल्याचे मोदी म्हणाले. मात्र, लॉकडाऊनच्या शिथिलतेवरुन ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. 

भारत सरकारने जर सर्वकाही खुलंच केलं आहे, तर लॉकडाऊन वाढविण्यात अर्थ काय? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. देशाच्या, राज्याच्या सीमा खुल्या करण्यात आल्या आहेत. रेल्वेसेवा सुरु झाली आहे, विमानसेवाही सुरु करण्यात आली आहे. तर, यापुढे लॉकडाऊन वाढविण्यात अर्थ काय? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत झालेल्या बैठकीत ममता यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

दरम्यान, लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करतांना आपण ग्रीन झोनमध्ये उद्योग-व्यवसाय सुरु होतील असे पाहिले आहे. मुंबईतही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरु करावी अशी विनंती मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच मजुरांची ने-आण करताना कोरोनाचा प्रसार होणार नाही त्याची त्या राज्यांनी काळजी घ्यावी, असेही ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालChief Ministerमुख्यमंत्री