शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"...म्हणून ही दुःखद घटना घडली"; राहुल गांधींनी महाकुंभ चेंगराचेंगरीबद्दल कोणते मुद्दे मांडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:08 IST

Rahul Gandhi Mahakumbh Stampede: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये २९ जानेवारी रोजी चेंगराचेंगरी झाली. त्यात काही लोकांचा मृतयू झाला. 

Mahakumbh Stampede Updates: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी (२९ जानेवारी) चेंगराचेंगरीची घटना घडली. यात दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. काही मुद्दे राहुल गांधींनी अधोरेखित केले असून, त्याकडे लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

त्रिवेणी संगमावर चेंगराचेंगरीची घटना घडली. घटनेतील मृतांबद्दल शोक व्यक्त विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोयी, सुविधा आणि व्यवस्थापनाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. 

राहुल गांधी चेंगराचेंगरीच्या घटनेवर काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पोस्टमध्ये म्हटले आहे, "प्रयागराज महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने अनेक लोकांचा मृत्यू आणि असंख्य लोक जखमी झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती तातडीने सुधारावी अशी आशा व्यक्त करतो."

व्यवस्था सुधारायला हवी -राहुल गांधी

"या दुःखद घटनेसाठी चुकीची व्यवस्था, व्यवस्थेतील उणीवा आणि सर्वसामान्य भाविकांऐवजी व्हीआयपींकडे जास्त लक्ष देणे, या गोष्टी जबाबदार आहेत. अजून महाकुंभ मेळ्याचा भरपूर वेळ बाकी आहे. आणखी महास्नान व्हायचे आहेत. आज घडली तशीच घटना पुढे होऊ नये, यासाठी सरकारने व्यवस्था सुधारायला हवी", असा सल्ला राहुल गांधींनी सरकारला दिला आहे. 

"व्हीआयपी संस्कृतीला लगाम लावायला हवा आणि सरकारने सर्वसामान्य भाविकांच्या आवश्यक गरजांसाठी आणखी चांगली व्यवस्था करायला हवी. काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आवाहन करतो की, त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना मदत करावी", असे आवाहनही राहुल गांधींनी केले आहे.

  

मौनी अमावस्या असल्याने २९ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता प्रयागराजमध्ये भाविक मोठ्या संख्येने आले. त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी एकाच वेळी गर्दी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. यातील मृतांची ओळख पटवण्याचे काम आता सुरू आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाRahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ