शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

... 'त्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 22:14 IST

कपिल सिब्बल यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षांचे लोकसभा निवडणुकीतील यश आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार यावर भाष्य केले.

नवी दिल्ली - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्वबळावर बहुमत मिळणं शक्य वाटत नाही. मात्र, केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसला 272 जागा जिंकण्याची खात्री नाही. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींचे नाव जाहीर केले नसल्याचे सिब्बल म्हणाले. 

कपिल सिब्बल यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षांचे लोकसभा निवडणुकीतील यश आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार यावर भाष्य केले. राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार का घोषित करण्यात येत नाही. याबाबत उत्तर देताना, काँग्रेसला 272 जागांचा आकडा पार करणे शक्य वाटत नाही, त्यामुळेच काँग्रेसने राहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले नाही. जर, 272 जागा काँग्रेसने जिंकल्या तर राहुल गांधींचे नाव जाहीर करायला काहीच हरकत नव्हती, असे सिब्बल यांनी म्हटले. मात्र, संयुक्त पुरोगामी आघाडीतील पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव घेण्यास त्यांनी टाळले. 

काँग्रेसला 272 जागा जिंकता येणार नाहीत, हे आम्हाला माहित आहे. तसेच, भाजपालाही 160 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. पण, काँग्रेस प्रणित आघाडीचेच सरकार येईलय. त्यानंतर, 23 मे रोजी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर होईल, असेही सिब्बल यांनी म्हटले. उत्तर प्रदेशातील आघाडीबाबत बोलताना, आम्हाला सपा आणि बसपाची आघाडी आहे. मात्र, काँग्रेसने समाजावादी पक्षाची साथ सोडली नव्हती, उलट समाजवादी पक्षच मायावती यांच्यासोबत गेला. या दोन्ही पक्षांनी मिळून आम्हाला केवळ 2 जाग सोडल्या. त्यामुळे तिथे सपासोबत आघाडी शक्य झाली नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले.  

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान