शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

...म्हणून मध्य गुजरातमध्ये भाजपाची मदार आता आदिवासी मतांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 11:57 IST

यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारात धार्मिक मुद्यांवर भर देण्यात आला होता.

ठळक मुद्दे मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. मध्य गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यारुन पटेल समाज भाजपावर काही प्रमाणात नाराज आहे.

अहमदाबाद - यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारात धार्मिक मुद्यांवर भर देण्यात आला होता. पण मागच्या दोनवर्षात उभ्या राहिलेल्या पटेल आरक्षण आंदोलनामुळे यंदा सर्वच समीकरणेच बदलून गेली आहेत. पहिल्या टप्प्यात कच्छ-सौराष्ट्रमध्ये मतदान पार पडले आता दुस-या टप्प्यात भाजपा आणि काँग्रेस दोघांनी मध्य गुजरावर लक्ष केंद्रीत केले आहे. 

मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा आहेत. मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. 2012 मध्ये भाजपाने मध्य गुजरातमध्ये 38 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मध्य गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यारुन पटेल समाज भाजपावर काही प्रमाणात नाराज आहे. ओबीसी सुद्धा भाजपाला साथ देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपाने यंदा मध्य गुजरातमधील आदिवासी मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 

आदिवासी मतदारांना खेचून आणण्यासाठी भाजपाने रणनिती आखून त्यानुसार काम केले आहे. खरतर इथला आदिवासी समाज काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. पण हेच आदिवासी भाजपाच्याही विरोधात नाहीत. त्यामुळे पटेल मते कमी झाल्यास जी तूट निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी भाजपाने आदिवासी मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्या वर्षी भाजपाने ज्या 20 जागा जिंकल्या होत्या. त्यातील 10 जागा एकटया वडोदरा जिल्ह्यातील होत्या. वडोदरा भाजपाचा बालेकिल्ला आहे.  मध्य गुजरातमध्ये म्हणावा तसा औद्योगिक विकास झालेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास, शेतक-यांचे प्रश्न इथेही आहेत. मागच्या 22 वर्षांपासून राज्यात सत्ता असल्याने भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधी लाटेचाही सामना करावा लागत आहे.  

नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावताना गुजरात निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

भारताने आपल्या राजकीय लढाईत पाकिस्तानला खेचू नये. अशी कटकारस्थान करण्याऐवजी स्वत:च्या हिम्मतीवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मह फैसल यांनी टि्वटमध्ये म्हटले  आहे. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा