शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

...म्हणून भाजपाच्या महिला उमेदवाराचा केला आयटम असा उल्लेख, कमलनाथ यांची सारवासारव

By बाळकृष्ण परब | Updated: October 19, 2020 16:12 IST

Kamal nath Statement on Imrat devi : कमलनाथ यांच्या विधानावरून संपूर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.

ठळक मुद्देआयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरला नाहीमला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत म्हणूनआयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणिपोटनिवडणुकीतील उमेदवार इमरती देवी यांचा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आयटम असा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झालेला आहे. कमलनाथ यांच्या विधानावरून संपूर्ण भाजपा कमलनाथ आणि काँग्रेस यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. तर कमलनाथ यांनीही स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा बचाव केला आहे.आज तक या हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले की, जेव्हा लोकसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं. १. विधानसभेची यादी येते तेव्हा त्यावर काय लिहिलेले असते तर आयटम नं.१. आयटम हा शब्द काही वाईट अर्थाने किंवा अपमान करण्याच्या हेतूने मी वापरला नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते. तेव्हा मी म्हणालो की, त्या ज्या येथील आयटम आहेत म्हणून.कमलनाथ पुढे म्हणाले की, आयटम या शब्दाचा वापर सर्वसामान्यपणे केला जातो. हा संसदीय वापरातील शब्द आहे. विधानसभेतही तो वापरला जातो. जर तुम्ही कुठला कार्यक्रम पाहत असाल तर त्यातही आज माझा आयटम नंबर वन ओमकारेश्वर आहे, असा उल्लेख असतो. मग हे काय अपमान करणारे आहे का. मला असं वाटत नाही. मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हे सारे काही सुरू आहे. तेच त्यांचे लक्ष्य आहे. आता त्यांनी जनतेसमोर जावं आणि आपल्या पंधरा वर्षांचा आणि ७ महिन्यांच्या हिशोब द्यावा, असे आव्हानही कमलनाथ यांनी दिले.सौदेबाजी करून आणि बोली लावून यांनी सरकार स्थापन केले आहे. हे लोक मध्य प्रदेशच्या जनतेला मूर्ख समजतात. जर मी कोक प्यायचं बंद केलं तर जनतेला रोजगार मिळणार आहे का, यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे चांगला अभिनेते आहेत. त्यांनी मुंबईत जाऊन अभिनय केला पाहिजे आणि मध्य प्रदेशचं नाव पुढे आणलं पाहिजे. त्यांनी अनेक वर्षे असाच अभिनय केलाय. आता जनतेला तो समजू लागला आहे, असेही कमलनाथ म्हणाले.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा