शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

म्हणून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी मानले परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 12:52 IST

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाची चहुबाजूंनी प्रशंसा होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सुषमा यांनी भाषणात केलेल्या आयआयटी आणि आयआयएमच्या उल्लेखावर तिरकस कटाक्ष टाकत त्यांचे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली, दि. 24 - संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाची चहुबाजूंनी प्रशंसा होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही सुषमा यांनी भाषणात केलेल्या आयआयटी आणि आयआयएमच्या उल्लेखावर तिरकस कटाक्ष टाकत त्यांचे कौतुक केले आहे. सुषमांनी काँग्रेसच्या दुरदृष्टीला मान्यता दिल्याबद्दल राहुल यांनी त्यांचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानची कोंडी केली. तसेच पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पाढा वाचत दहशतवादाला आळा घालण्याचे आवाहन केले. यावेळी सुषमा स्वराज यांनी भारतातील आयआयटी आणि आयआयएमचा उल्लेख करत भारताने प्रगतीचा तर पाकिस्तानने दहशतवादी तळ उभारण्याचा मार्ग पत्करल्याचा टोला लगावला. सुषमा यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणले, सुषमाजी, आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्याच्या काँग्रेस सरकारांच्या दुरदृष्टी आणि वारशाला मान्यता देण्यासाठी धन्यवाद! राहुल गांधीच्या या ट्विटचे अनेक नेटिझन्स समर्थन करत आहेत. तर काही जण त्यावर टीकाही करत आहेत. आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल पाकिस्तानला सुनावले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता असा टोला लगावला.  आम्ही गरिबीशी लढत आहोत, पण पाकिस्तान आमच्याशी लढत आहे असं सांगत सुषमा स्वराजांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांचं भाषण सुरु असताना प्रत्येकजण 'कोण बोलतंय ते पहा' (Look who is talking) असं बोलत होतं असा टोलाही लगावला.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला. जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी देऊन टाकला. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSushma Swarajसुषमा स्वराजGovernmentसरकारIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस