शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

...म्हणून चीन झाला भारताविरोधात आक्रमक, राहुल गांधींनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 12:50 IST

अशी वेळ का आली आहे, ज्यामुळे आपण भारताविरोधात पाऊल उचलू शकतो, असा चीनच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल.  

ठळक मुद्दे. देशाची अर्थव्यवस्था, शेजारील राष्ट्रांशी संबंध आणि परराष्ट्र धोरणाबाबत राहुल गांधी यांनी स्पष्ट भूमिका मांडलीपूर्वी अमेरिका, रशिया, युरोपसह जवळपास सर्वच देशांसोबत आपले संबंध चांगले होते. मात्र आता आपले संबंध केवळ व्यापारापुरते उरले आहेतदेशाचे संरक्षण हे मुख्यत्वेकरून परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या विश्वासावर अवलंबून असते. मात्र गेल्या सहा वर्षांत आपला देश या सर्व बाबतीत अपयशी ठरला आहे

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून, त्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था, शेजारील राष्ट्रांशी संबंध आणि परराष्ट्र धोरणाबाबत राहुल गांधी यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून, चीनने घुसखोरी करण्यासाठी नेमकी हीच वेळ का निवडली, असा सवाल उपस्थित केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, अशी वेळ का आली आहे, ज्यामुळे आपण भारताविरोधात पाऊल उचलू शकतो, असा चीनच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. ही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल.  देशाचे संरक्षण हे मुख्यत्वेकरून परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या विश्वासावर अवलंबून असते. मात्र गेल्या सहा वर्षांत आपला देश या सर्व बाबतीत अपयशी ठरला आहे.

देशाच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, पूर्वी अमेरिका, रशिया, युरोपसह जवळपास सर्वच देशांसोबत आपले संबंध चांगले होते. मात्र आता आपले संबंध केवळ व्यापारापुरते उरले आहेत. रशिसासोबतचे आपले संबंध बिघडले आहेत. पूर्वी नेपाळ, भूतान, श्रीलंका हे आपले मित्र होते. पाकिस्तान वगळता इतर सर्व शेजारी आमच्यासोबत काम करत होते. मात्र सध्या प्रत्येकजण आमच्याविरोधात बोलत आहे.

एकेकाळी अर्थव्यवस्था ही आमची ताकद होती. मात्र आज देशातील बेरोजगारी शिखरावर पोहोचली आहे. लहान व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. मात्र सरकार आमचे म्हणणे ऐकून घेत नाही आहे. जर तुम्ही देश म्हणून विचार करत असाल तर प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. जर अर्थव्यवस्थेत पैसे ओतले गेले नाहीत तर सर्व काही बरबाद होईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारindia china faceoffभारत-चीन तणाव