शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

"राहुल गांधींना पराभूत करणारी मी एकमेव व्यक्ती होती"; स्मृती इराणींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 08:22 IST

Smriti Irani And Rahul Gandhi : इराणी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधींचा सुमारे 55,000 मतांच्या फरकाने पराभव केला.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सांगितले की, अमेठीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात त्या महिला आहेत म्हणून नाही तर पक्षाला वाटत होते की केवळ त्याच राहुल यांचा पराभव करू शकतात. तसेच महिला रिअल एस्टेट डेव्हलपर्सना त्वरीत मंजुरी देण्याचा विचार करावा असंही म्हटलं आहे. 

"मी पुरुष विकासकांशी स्पर्धा करेन... मी एक महिला आहे म्हणून मला अमेठीला पाठवण्यात आले नाही" असं महिला आणि बालविकास मंत्री इराणी यांनी क्रेडाई या रिअल इस्टेट डेव्हलपर्सच्या संघटनेने आयोजित केलेल्या परिषदेत सांगितले. मला अमेठीला पाठवण्यात आले कारण त्या माणसाला (राहुल गांधी) पराभूत करणारी मी एकमेव व्यक्ती होती." इराणी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधींचा सुमारे 55,000 मतांच्या फरकाने पराभव केला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींकडून त्यांचा एक लाख मतांच्या फरकाने पराभव झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी कर्नाटकातील जनतेचे आणि तेथील कार्यकर्ते, नेत्यांचे आभारही मानले.

“कर्नाटक निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती. तर दुसरीकडे गरीब जनतेची ताकद होती. जनतेच्या शक्तीनं ताकदीचा पराभव केला. हेच आता प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांसोबत उभी राहिली. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर लढलो. आम्ही द्वेषानं, चुकीच्या शब्दांचा वापर करून ही लढाई लढलो नाही,” असं राहुल गांधी म्हणाले.

“आम्ही प्रेमानं ही लढाई लढलो. हा देशाला प्रेमच आवडतं हे कर्नाटकानं दाखवून दिलं. कर्नाटकात आता द्वेषाचा बाजार बंद झालाय आणि प्रेमाची दुकानं खुली झाली आहेत. हा सर्वांचा विजय आहे. सर्वप्रथम हा कर्नाटकातील जनतेचा विजय आहे. आम्ही कर्नाटकातील जनतेला ५ आश्वासनं दिली होती. आम्ही ती पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करू” असंही त्यांनी स्पष्ट केल. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस