शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

"६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 15:20 IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केला हल्लाबोल

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करून अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. एएनआयशी बोलताना स्मृती इराणी यांनी आरोप केला की, गांधी कुटुंबाने 'औद्योगीकरणाच्या' नावाखाली अमेठीतील शेतकरी आणि इतर लोकांच्या जमिनी हडप केल्या. तसेच अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वापरण्यात येणारी जमीन गांधी परिवाराने कार्यालयासाठी बळकावली.

गांधी परिवाराकडून अमेठीतील जनतेची फसवणूक

स्मृती इराणी म्हणाल्या की, लोक माझ्यावर विश्वास ठेवू शकतात हे पटवून देण्यासाठी मला थोडा वेळ लागला. गांधी घराण्याने लोकांकडून त्यांच्या जमिनी लुटल्या होत्या, हे मी संसदेत बोलले. ३० एकर जमीन ६०० रुपये भाड्याने घेतली. गांधी परिवार तिथे स्वतःसाठी छान आणि सुंदर कॉम्प्लेक्स बांधतोय. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा हे अमेठीतील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे आदेश देऊ शकतात हा परकीय विचार आहे. परंतु त्यांनी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली या जमिनी घेतल्या आहेत. गांधी कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंदोलन करणाऱ्या मुलींना तुरुंगात टाकण्यात आल्याचा दावाही इराणी यांनी केला.

पॉडकास्ट दरम्यान, स्मृती इराणी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय आयुष्याबद्दल देखील सांगितले आणि त्यांना शिष्यवृत्ती कशी मिळाली ते सांगितले. मुंबईत जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. आई-वडील वेगवेगळ्या विचारसरणीचे असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात अनेक मतभेद झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्मृती इराणी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये राहुल गांधींकडून पराभूत झाल्या, त्यानंतर 2019 मध्ये इराणी यांना विजय मिळवत त्या पराभवाचा बदला घेतला. सध्याच्या घडीला ४७ वर्षीय इराणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण सदस्य आहेत.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस