शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

"६०० रुपयांना घेतली ३० एकर जमीन, गांधी परिवाराने अमेठीच्या शेतकऱ्यांची केली लूट"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 15:20 IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर केला हल्लाबोल

Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करून अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. एएनआयशी बोलताना स्मृती इराणी यांनी आरोप केला की, गांधी कुटुंबाने 'औद्योगीकरणाच्या' नावाखाली अमेठीतील शेतकरी आणि इतर लोकांच्या जमिनी हडप केल्या. तसेच अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठी वापरण्यात येणारी जमीन गांधी परिवाराने कार्यालयासाठी बळकावली.

गांधी परिवाराकडून अमेठीतील जनतेची फसवणूक

स्मृती इराणी म्हणाल्या की, लोक माझ्यावर विश्वास ठेवू शकतात हे पटवून देण्यासाठी मला थोडा वेळ लागला. गांधी घराण्याने लोकांकडून त्यांच्या जमिनी लुटल्या होत्या, हे मी संसदेत बोलले. ३० एकर जमीन ६०० रुपये भाड्याने घेतली. गांधी परिवार तिथे स्वतःसाठी छान आणि सुंदर कॉम्प्लेक्स बांधतोय. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा हे अमेठीतील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे आदेश देऊ शकतात हा परकीय विचार आहे. परंतु त्यांनी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली या जमिनी घेतल्या आहेत. गांधी कुटुंबाच्या विरोधात जाऊन आंदोलन करणाऱ्या मुलींना तुरुंगात टाकण्यात आल्याचा दावाही इराणी यांनी केला.

पॉडकास्ट दरम्यान, स्मृती इराणी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय आयुष्याबद्दल देखील सांगितले आणि त्यांना शिष्यवृत्ती कशी मिळाली ते सांगितले. मुंबईत जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. आई-वडील वेगवेगळ्या विचारसरणीचे असल्यामुळे त्यांच्या कुटुंबात अनेक मतभेद झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्मृती इराणी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये राहुल गांधींकडून पराभूत झाल्या, त्यानंतर 2019 मध्ये इराणी यांना विजय मिळवत त्या पराभवाचा बदला घेतला. सध्याच्या घडीला ४७ वर्षीय इराणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण सदस्य आहेत.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस