्रपान २ : गरमीचा दाह वाढला
By Admin | Updated: May 5, 2015 01:20 IST2015-05-05T01:20:59+5:302015-05-05T01:20:59+5:30
गरमीचा दाह वाढला

्रपान २ : गरमीचा दाह वाढला
ग मीचा दाह वाढलापणजी : गरमीचा दाह राज्यात वाढत असून सोमवारी तापमान ३४.८ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. सामान्य तापमानापेक्षा १ अंश सेल्सियसने ते अधिक आहे. दिवसाच्या तापमानाबरोबरच रात्रीचे तापमानही २८ अंश सेल्सियसपेक्षा खाली जात नाही. त्यामुळे उकाडा कायम राहत आहे. सोमवारीही तीच परिस्थिती होती. पुढील सहा दिवस तापमान हे वाढलेलेच राहणार आहे. कमाल तापमान हे ३५ अंश सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. वाढणार्या तापमानापेक्षा खरी समस्या होत आहे ती वाढणार्या आर्द्रतेची. सोमवारी हवेत ७९ टक्के आर्द्रता होती. सामान्य आर्द्रतेपेक्षा ती ६ टक्क्यांनी अधिक होती. संपूर्ण पंधरा दिवसांत आर्द्रता ही ११ ते ५ टक्क्यांनी अधिक राहिली आहे. येणार्या ६ दिवसांतही त्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे नाहीत, असे हवामान खात्याचे अंदाज स्पष्ट करीत आहेत.