शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
2
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
3
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
4
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
5
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
6
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
7
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
8
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
9
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
10
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
11
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
12
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
13
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
14
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
15
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
16
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Sensex ३०० अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, मेटल शेअर्स सुस्साट
17
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
18
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
19
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
20
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! त्वचा काळा पडली, उभं राहणंही अवघड; कुटुंबाला रहस्यमय आजाराचा विळखा, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 10:25 IST

एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडत आहे.

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरच्या पुवायां भागातील बडागावमध्ये एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडत आहे. उपचार करूनही कोणालाच फायदा होत नाही. या कुटुंबातील एका मुलीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांची टीम कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे, परंतु अद्याप या आजाराचे कारण शोधू शकलेले नाही. कुटुंबीयांची आता जिल्हा रुग्णालयात चाचणी केली जाणार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

बडागाव येथील 50 वर्षीय सियाराम आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करतात. सहा महिन्यांपूर्वी सियारामचा मुलगा श्रीपाल याच्या अंगावर खाज यायला सुरुवात झाली. यानंतर त्वचेचा रंग काळा होऊ लागला. श्रीपाल यांनी प्रथम गावातच उपचार करून घेतले. काही फायदा होत नाही म्हणून शहाजहानपूरच्या खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू केले, पण हे वाढतच गेलं. यानंतर सियाराम, त्यांची पत्नी गुड्डी देवी, श्रीपाल यांची पत्नी देवराणी, मुलगा अनुज, मुलगी रीमा, भाऊ अवधेश आणि बहीण सीमा देवी यांनाही या आजाराने ग्रासले. सर्वांवर शाहजहांपूर येथील खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

आजारपणामुळे घाबरले कुटुंबीय 

श्रीपालची 17 वर्षांची बहीण शिवराणी हिचा 16 जानेवारीच्या रात्री मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवराणीचा मृत्यू त्वचा काळवंडण्याच्या आजारामुळे झाला आहे, असे त्यांचे मत आहे. माहिती मिळताच सीएचसीचे अधीक्षक डॉ.सुरेंद्र कुमार यांनी पथकासह मंगळवारी सियारामच्या घरी पोहोचून माहिती घेतली. बुधवारीही डॉक्टरांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबीयांकडून आजाराची स्थिती जाणून घेतली. डॉक्टर अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. सीएचसी अधीक्षकांनी कुटुंबीयांवर पूर्ण उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडितांची तपासणी केली जाईल, जेणेकरून रोग आणि त्याचे कारण समजू शकेल, असे अधीक्षकांनी सांगितले.

शरीराची अवस्था पाहून डॉक्टरांना बसला धक्का

श्रीपाल यांनी सांगितले की, त्या लोकांच्या शरीरावर प्रथम छोटे छोटे फोड दिसतात. यानंतर शरीरात सूज येऊ लागते. हात-पाय चालणे कठीण झाले आहे. अशक्तपणा दिसू लागतो. डोळ्यातून पाणी येऊ लागते. शरीर कोरडे होते. उभे राहण्यासही त्रास होतो. श्रीपालच्या म्हणण्यानुसार, त्यांची बहीण शिवराणीचा या आजाराने मृत्यू झाला. भाई अवधेश यांना शाहजहांपूर येथील खासगी रुग्णालयातून लखनौला रेफर करण्यात आले. आरोग्य विभागाच्या संपर्कात आल्यानंतर अवधेशला घरी आणण्यात आले आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येईल. त्याची प्रकृती गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश