शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

बापरे! त्वचा काळा पडली, उभं राहणंही अवघड; कुटुंबाला रहस्यमय आजाराचा विळखा, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 10:25 IST

एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडत आहे.

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरच्या पुवायां भागातील बडागावमध्ये एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडत आहे. उपचार करूनही कोणालाच फायदा होत नाही. या कुटुंबातील एका मुलीचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांची टीम कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे, परंतु अद्याप या आजाराचे कारण शोधू शकलेले नाही. कुटुंबीयांची आता जिल्हा रुग्णालयात चाचणी केली जाणार आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

बडागाव येथील 50 वर्षीय सियाराम आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करतात. सहा महिन्यांपूर्वी सियारामचा मुलगा श्रीपाल याच्या अंगावर खाज यायला सुरुवात झाली. यानंतर त्वचेचा रंग काळा होऊ लागला. श्रीपाल यांनी प्रथम गावातच उपचार करून घेतले. काही फायदा होत नाही म्हणून शहाजहानपूरच्या खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू केले, पण हे वाढतच गेलं. यानंतर सियाराम, त्यांची पत्नी गुड्डी देवी, श्रीपाल यांची पत्नी देवराणी, मुलगा अनुज, मुलगी रीमा, भाऊ अवधेश आणि बहीण सीमा देवी यांनाही या आजाराने ग्रासले. सर्वांवर शाहजहांपूर येथील खासगी डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

आजारपणामुळे घाबरले कुटुंबीय 

श्रीपालची 17 वर्षांची बहीण शिवराणी हिचा 16 जानेवारीच्या रात्री मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवराणीचा मृत्यू त्वचा काळवंडण्याच्या आजारामुळे झाला आहे, असे त्यांचे मत आहे. माहिती मिळताच सीएचसीचे अधीक्षक डॉ.सुरेंद्र कुमार यांनी पथकासह मंगळवारी सियारामच्या घरी पोहोचून माहिती घेतली. बुधवारीही डॉक्टरांचे पथक गावात पोहोचले आणि त्यांनी कुटुंबीयांकडून आजाराची स्थिती जाणून घेतली. डॉक्टर अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. सीएचसी अधीक्षकांनी कुटुंबीयांवर पूर्ण उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे. पीडितांची तपासणी केली जाईल, जेणेकरून रोग आणि त्याचे कारण समजू शकेल, असे अधीक्षकांनी सांगितले.

शरीराची अवस्था पाहून डॉक्टरांना बसला धक्का

श्रीपाल यांनी सांगितले की, त्या लोकांच्या शरीरावर प्रथम छोटे छोटे फोड दिसतात. यानंतर शरीरात सूज येऊ लागते. हात-पाय चालणे कठीण झाले आहे. अशक्तपणा दिसू लागतो. डोळ्यातून पाणी येऊ लागते. शरीर कोरडे होते. उभे राहण्यासही त्रास होतो. श्रीपालच्या म्हणण्यानुसार, त्यांची बहीण शिवराणीचा या आजाराने मृत्यू झाला. भाई अवधेश यांना शाहजहांपूर येथील खासगी रुग्णालयातून लखनौला रेफर करण्यात आले. आरोग्य विभागाच्या संपर्कात आल्यानंतर अवधेशला घरी आणण्यात आले आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येईल. त्याची प्रकृती गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश