शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

गुजरातमध्ये अडकलेले १५०० खलाशी नारगोल बंदरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 01:28 IST

९३ कामगारांना डहाणूत उतरवले : तपासणीसाठी घेतले ताब्यात

पालघर/बोर्डी : गुजरातच्या मांगलोर बंदरात अडकलेल्या १७ ट्रॉलर्समधून सुमारे १५०० खलाशी कामगार रविवारी गुजरातच्या नारगोल बंदरात दाखल झाले. त्यातील ९३ कामगारांना डहाणू तालुक्याच्या किनाऱ्यावर उतरविण्यात आले असून तपासणीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आपल्या कुटुंबाच्या ओढीने घरी येण्यासाठी २० ट्रॉलर्समधून १५०० ते दोन हजार खलाशी सोमवारी येण्याच्या मार्गावर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ट्रॉलर्स मालकांनी कुठलीही परवानगी न घेतल्याने गुन्हा दाखल करून ती ट्रॉलर्स जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.

गुजरातच्या पोरबंदर, ओखा, वेरावल तर सौराष्ट्रमधील मांगलोर येथील बंदरात खलाशी कामगार म्हणून रोजगारासाठी गेलेल्या १८०० कामगारांना ४ एप्रिल रोजी नारगोलच्या बंदरात उतरविण्यात आले होते. त्यातील १,१२२ खलाशी गुजरातमधील तर १०० ते १५० खलाशांना त्यांच्या जिल्हा प्रशासनाने स्वीकारले होते. मात्र, पालघर जिल्ह्यातील ५०० ते ६०० कामगारांना महाराष्ट्र सरकारने स्वीकारण्यास परवानगी नाकारल्याने त्यांना माघारी पोरबंदरमध्ये परतावे लागले होते. आपल्या सुटकेसाठी कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याने त्या खलाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा माघारी आणण्यासाठी गुजरात सरकारशी बोलत असल्याचे सांगितले जात असताना कुठल्याही हालचाली न झाल्याने गुजरातच्या बंदरात काही खलाशांचा उद्रेक होत जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. मात्र, आता शनिवारी सौराष्ट्रजवळील मांगलोर बंदरातून १४ ट्रॉलर्समधून १४५५ खलाशी नारगोल बंदराकडे रवाना झाले होते. रविवारी दुपारी या ट्रॉलर्समधून १३६२ कामगारांना नारगोल बंदरातील प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले. तर ‘जय वेरावली कृपा’ ही ट्रॉलर्स पालघरच्या झाई बंदरात आणण्यात येऊन त्यातून ९३ कामगारांना उतरविण्यात आले.या वेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा या कामगारांनी आपल्या बंदरात आल्यावर दिल्या. डहाणूचे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी घटनास्थळी भेट देत या सर्व कामगारांची तपासणी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धनारे, तहसीलदार स्वाती घोंगडे आदी उपस्थित होते.ट्रॉलर्स मालकाविरोधात गुन्हा दाखलविनापरवानगी आपल्या भागात आल्याचा ठपका ठेवीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या ट्रॉलर्स मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या घराच्या ओढीने वेरावल बंदरातून १३, तर ओखा बंदरातून ७ अशा एकूण २० ट्रॉलर्समधून सुमारे १६०० कामगार नारगोल व पालघरकडे निघाले आहेत. 

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या