शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

खड्ड्यांमुळे भारतात दिवसाला सहा जण गमावतात आपला जीव, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 11:13 IST

भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.

ठळक मुद्देभारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यूमृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त

नवी दिल्ली - भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.  अपघातांच्या या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून खड्ड्यांमुळे वर्षभरात 714 जणांचा मृत्यू झाला असून, यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे 329 जणांनी जीव गमावला आहे. 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. 

विशेष म्हणजे सर्वात जास्त वाहनसंख्या असणा-या दिल्लीत खड्ड्यांमुळे एकही अपघात झाला नसल्याची नोंद आहे.  सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन, पोलीस कशाप्रकारे अपघाताच्या ख-या कारणाचा शोध न घेता, तपास दुस-या दिशेला वळवतात हे स्पष्ट झालं आहे. प्रवाशांकडून वारंवार रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार केली जात असतानाही गतवर्षी वाहतूक मंत्रालयाने अपघाताची आकडेवारी जाहीर करताना खड्ड्यांमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. 

एका पोलीस अधिका-याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, 'रस्त्यांची मालकी असणा-या एजन्सीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी चर्चा असते, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण फार कमी आहे. अपघातासाठी चालकाला किंवा रस्त्याच्या दुरावस्थेलाच जबाबदार ठरवलं जातं. अनेकदा पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचतात, आणि जखमींचा रुग्णालयात मृत्यू होतो'.

गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याची हौस जिवावर, फक्ता एका वर्षात 2100 जणांचा मृत्यू वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार गतवर्षी गाडी चालवत असताना मोबाइलचा वापर केल्याने जवळपास 2138 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रस्ते दुर्घटनांमध्ये होणा-या सर्वात जास्त मृत्यूमागचं मुख्य कारण मोबाइलचा वापर आहे.  वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर हरियाणाचा क्रमांक आहे. राजधानी दिल्लीत गतवर्षी दोन जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील आकडा मोठा आहे. महाराष्ट्रात एकूण 172 जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्यांदाच वाहतूक मंत्रालयाने राज्यांकडून ही माहिती गोळा केली आहे. 

अहवालानुसार, देशात प्रत्येक तासाला रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू होतो. वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलचा वापर यामागे मुख्य कारण आहे. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्यांवरुन चालणारे लोकही चालताना मोबाइलचा वापर केल्याने अपघाताला बळी पडले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, 'वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने, अपघात होण्याची शक्यता चौपटीने वाढते'. 'सेव्ह लाइफ फाऊंडेशन'ने देखील यासंबंधी एक सर्व्हे केला होता. सर्व्हेमध्ये वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण होते असं समोर आलं होतं. सर्व्हेत सहभागी झालेल्या 47 टक्के लोकांनी गाडी चालवताना मोबाइलवर फोन आल्यास आपण उत्तर देतो असं मान्य केलं होतं.  

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा