शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

लग्नात रसगुल्ल्यावरून तुफान राडा; कमी पडताच जोरदार हाणामारी, 6 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:23 IST

एका लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने परिस्थिती इतकी बिघडली की थेट हाणामारी झाली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने परिस्थिती इतकी बिघडली की थेट हाणामारी झाली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले. या भांडणात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील शमसाबाद भागात ही घटना घडली. शमसाबाद पोलीस स्टेशन प्रभारी अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसारस ब्रृजभान कुशवाह यांच्या घरी लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान कोणीतरी रसगुल्ला कमी पडले यावरून टीका केली. यावरून वाद इतका वाढला की लग्न समारंभात हाणामारी झाली आणि 6 जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान देवी, योगेश, मनोज, कैलास, धर्मेंद्र आणि पवन हे जखमी झाले आहेत. शमसाबाद हे आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील एक शहर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एत्मादपूरमध्ये एका लग्नात मिठाई न मिळाल्याने झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

2014 मध्ये कानपूर देहातच्या कुरमापूर गावात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. उन्नावमधील एका गावातून लग्नाची वरात आली होती.लग्नाच्या वेळी वराचा चुलत भाऊ मनोजला त्याच्या ताटात दोन रसगुल्ले घ्यायचे होते. मात्र मुलीच्या बाजूने कोणीतरी त्याला एकच रसगुल्ला घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली.

मुलीने लग्नास दिला नकार 

लग्नाची वरात आली तेव्हा सर्व काही ठीक चाललं होतं. पण नंतर रसगुल्ल्यावरून झालेल्या भांडणामुळे लग्न मोडलं. हा वाद इतका वाढला की लग्नात पाहुणे आणि घरची मंडळी यांच्यात हाणामारी झाली. दरम्यान, मुलाच्या बाजूने मुलीच्या वडिलांनाही शिवीगाळ केली. ही घटना तरुणीला कळल्यावर तिने लग्नास नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न